दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS: *महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखा व्यवस्थापक विरोधात शेतकरी करणार आंदोलन* _पिक कर्ज न मिळाल्याने शेतकऱ्यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन_

 *महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखा व्यवस्थापक विरोधात शेतकरी करणार आंदोलन*

_पिक कर्ज न मिळाल्याने शेतकऱ्यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन_ 



दिंद्रुड ,प्रतिनिधी 


माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा व्यवस्थापक यांच्या मनमानी कारभाराला वैतागलेल्या शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना बँक शाखा व्यवस्थापकांवर कारवाई करत तात्काळ पीक कर्ज वाटप करून देण्याची मागणी केली आहे. 


    गेल्या चार महिन्यांपासून दिंद्रुड येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक श्री कानडे हे शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत शेतकऱ्यांनी ग्रामीण  बँकेच्या वारंवार चकरा मारूनही नवीन पीक कर्ज न मिळाल्याने व शेती मशागत करण्यास येणाऱ्या अडचणीमुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ नवीन पीक कर्ज  न मिळाल्यास येत्या दिनांक 14 रोजी महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर शाखा व्यवस्थापकाच्या विरोधात कारवाई करेपर्यंत आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हंटले आहे. जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनावर नारायण चांदबोधले,दिलीप कोमटवार,अतुल चव्हाण, अखील सय्यद,ज्ञानेश्वर आरणकल्ले, नागेश वकरे, राजाभाऊ कटारे आदींसह शेतकर्‍यांच्या सह्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....