इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS:परळी शहराला एक दिवसआड करून पिण्याचे पाणी सोडा―प्रा.विजय मुंडे

 *परळी शहराला एक दिवसआड करून पिण्याचे पाणी सोडा―प्रा.विजय मुंडे*



*मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी*



परळी/प्रतिनिधी...परळी शहराला पाणीपुरवठा करणारे वान धरण हे ओव्हरफ्लो झाले आहे चार वर्षापूर्वी वान धरण ओव्हर फ्लो झाले होते परळी शहराला नगरपालिकेच्या वतीने दर पाच दिवसाला पाणीपुरवठा पाणीसाठा उपलब्ध नसल्यामुळे केला जात होता परंतु आता वान धरण ओव्हर फ्लो झाल्यामुळे परळी शहराला एक दिवसाआड करून पाणीपुरवठा करावा व परळी करांची तहान भागवावी अशी मागणी  परळी नगरपालिकेचे  मुख्याधिकारी  यांच्याकडे  निवेदनाद्वारे  परळी मार्केट कमिटीचे  उपसभापती  प्रा. विजय मुंडे  यांनी केली आहे. तसेच शेतीसाठी पाणी मिळणार असल्यामुळे बळीराजा आनंदित झाला आहे.



   दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ,वान प्रकल्पामध्ये पाणीसाठा हा आगामी काळासाठी आरक्षित सुद्धा राहिला पाहिजे जेणेकरून पिण्याच्या पाण्यासाठी परळी करांची गैरसोय होणार नाही याचीही काळजी प्रशासनाने घेणे गरजेचे आहे तसेच शेतकरी सुद्धा आनंदित झाला आहे कारण वान धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे शेतीसाठी सुद्धा  पाणी  मिळणार आहे.



    परळीतील सामान्य माणूस हा सर्वस्वी नगरपालिकेच्या पाणीपुरवठा नळ योजनेवर अवलंबून आहे त्यामुळे त्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस  गंभीर होत चालली होती परंतु वान धरण ओव्हर फ्लो झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या सुटणार आहे अशी आशा सुद्धा सामान्य नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. प्रत्येकच सामान्य माणसाकडे बोर अथवा विकत घेण्याची परिस्थिती नाही त्यामुळे या सर्व गोष्टीचा विचार करता प्रशासनाने एक दिवसाआड करून परळी शहराला पाणीपुरवठा करावा अशी मागणी निवेदनाद्वारे प्रा .विजय मुंडे यांनी केली आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या