इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:कोरोना बाधित पत्रकारांसाठी मराठी पत्रकार परीषदेची शासनाकडे मागणी.

 *कोरोना बाधित पत्रकारांसाठी राज्यात शासकीय आणि धर्मदाय आयुक्तांच्या अखत्यारित असलेल्या खासगी रुग्णालयात राखीव बेडची व्यवस्था प्राधान्याने करणेबाबत मराठी पत्रकार परीषदेची शासनाकडे मागणी.


...................        

याबाबत मराठी पत्रकार परिषदेने मा. मुख्यमंत्री, मा. आरोग्यमंत्री व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पत्रे पाठविली आहेत. या पत्रानुसार, राज्यात दीडशेच्यावरती पत्रकारांना कोरोनाची बाधा झालेली आहे. त्यातील बहुतेकजण बरे होऊन घरी गेले असले तरी किमान 11 पत्रकार कोरोना विरोधातली लढाई हरले आहेत. आजही किमान 50 पत्रकार विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. मात्र पत्रकारांना व्यवस्थित उपचार मिळत नसल्याच्या सातत्यानं तक़ारी येत आहेत. पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांचंही योग्य उपचार न मिळाल्यानं निधन झाल्यांची दुर्दैवी घटना पुण्यात घडली. त्यांना वेळेत अ‍ॅम्ब्युलन्सची व्यवस्था तसेच ऑक्सिजनही न मिळाल्यामुळे एका तरूण आणि उमद्या पत्रकाराचं निधन झाले, ही अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे. यापुढे राज्यातील कोणत्याही पत्रकारावर अशी वेळ येऊ नये, म्हणून पत्रकारांसाठी राखीव खाटा ठेवाव्यात, अशी मराठी पत्रकार परिषदेची आग्रही मागणी आहे. कृपया या मागणीचा तातडीने विचार व्हावा.  पांडुरंग रायकर हे केवळ अव्यवस्थेचे बळी ठरले आहेत, परिषदेची मागणी आहे की, त्यांच्या कुटुंबियांना योग्य ती आर्थिक नुकसान भरपाई दिली जावी. आणि कोरोना काळात कोरोना यौध्दे असलेल्या पत्रकारांना आपले काम अधिक निर्धाराने करता येईल, अशी व्यवस्था व्हावी, अशी आग्रही विनंती परिषदेच्या वतीने करण्यात आल्याचे परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख व विश्वस्त किरण नाईक यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!