दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS:बाबरी उद्‌ध्वस्त प्रकरण : निकाल देऊन न्यायाधीश झाले निवृत्त*

 *⭕बाबरी उद्‌ध्वस्त प्रकरण : निकाल देऊन न्यायाधीश झाले निवृत्त*                   

 -------------------------- 



लखनऊ – अयोध्येमध्ये १९९२ साली बाबरी मशिद उद्‌ध्वस्त केल्याप्रकरणी सर्व आरोपींची आज निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.  यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्यासह अन्य आरोपींना मोठा दिलासा मिळाला आहे. लखनऊच्या विशेष सीबीआय न्यायालयाच्या न्यायाधीश सुरेंद्र कुमार यादव यांनी तब्बल २८ वर्षानंतर हा ऐतिहासिक निकाल दिला.

बाबरी मशिद उद्‌ध्वस्त प्रकरणावरील महत्वपूर्ण निर्णयाबरोबर न्यायाधीश सुरेंद्र कुमार यादव निवृत्त होणार आहे. या निर्णयासाठी त्यांच्याकडे आज ५ वाजेपर्यंत वेळ होता. आजच त्यांचा कार्यकाळ संपणार आहे.

सुरेंद्र कुमार यादव यांचे अयोध्यासोबत जुनेच नाते आहे. त्यांची पहिली नियुक्ती अयोध्येतच झाली होती.  त्यांचा कार्यकाळ ३० सप्टेंबर २०१९ रोजीच समाप्त झाला होता. परंतु, बाबरी मशिद उद्‌ध्वस्त  प्रकरणाची सुनावणी पूर्ण करण्यासाठी तसेच यावर निकाल देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एका वर्षाची मुदत वाढवून दिली होती. 

दरम्यान, विशेष सीबीआय कोर्टाच्या न्यायाधीश एस.के. यादव यांनी १६ सप्टेंबर रोजी बाबरी मशिद उद्‌ध्वस्त प्रकरणी ३२ आरोपींना सुनावणीवेळी हजर राहण्याचे आदेश दिले होते. या आरोपींमध्ये माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी, माजी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्याशिवाय विनय कटियार आणि साध्वी ऋतंभरा यांचा समावेश आहे. उमा भारती आणि कल्याण सिंह यांना करोना विषाणूची लागण झाली असल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. राम मंदिर उभारणीसाठीच्या प्रभारी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय हेही आरोपींमध्ये आहेत. सुनावणीवेळी साध्वी ऋतंभरा यांच्यासमवेत १८ आरोपी कोर्टात उपस्थित होते तर अडवाणी यांच्यासह काही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....