इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS:आर्य समाजामुळे हैदराबाद संग्रामास पूर्णत्व प्राप्त झाले"---------अभ्यासक डॉ सोमनाथ रोडे यांचे प्रतिपादन.

 आर्य समाजामुळे हैदराबाद संग्रामास पूर्णत्व प्राप्त झाले -अभ्यासक डॉ. सोमनाथ रोडे यांचे प्रतिपादन    


     
                               परळी वैजनाथ ,दि.१८-.                निजामाच्या जुलमी राजवटीतून सामान्य जनतेला मुक्त करण्यासाठी आर्य समाजाने जो संघर्षमय लढा दिला, तो अतिशय जाज्वल्य असून युगानुयुगांपर्यंत प्रेरणा देत राहील. आर्य समाजाच्या बलिदानामुळे हैदराबादच्या क्रांतिकारी लढ्यास पूर्णत्व प्राप्त झाले, असे उद्गार प्रसिद्ध इतिहासतज्ञ प्राचार्य डॉ सोमनाथ रोडे यांनी काढले .            महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभेच्या वतीने गेल्या सप्ताहभर चाललेल्या "हैदराबाद संग्रामातील आर्यांची शौर्यगाथा" या वेबिनार व्याख्यानमालेच्या समारोपात काल(दि.१७) श्री रोडे प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते.  अध्यक्षस्थानी आर्य सभेचे प्रधान श्री योगमुनीजी हे होते .                                             आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून श्री रोडे यांनी आर्यसमाजाच्या क्रांतिकारी चळवळीचा इतिहास विशद केला. ते म्हणाले ,' आर्य समाजाची चळवळ ही सर्वव्यापी होती. धार्मिक ,सामाजिक आणि राष्ट्रीय स्वातंत्र्य अशा तिन्ही पैलूवर  क्रांतिकारकांनी लढा दिला. यासाठी हजारो आर्यनेते    उत्तर भारतातून आले. त्यांनी हैदराबादच्या भूमीत स्वातंत्र्य संग्रामासाठी फार मोठे वातावरण निर्माण केले .अनेकांनी स्वसुखाची  पर्वा न करता प्राण तळहाती घेऊन मोठ्या धैर्याने हा संग्राम लढला. परिणामी भारतीय लष्कराला हैदराबाद संस्थान भारतात विलीन करणे शक्य झाले.    या संग्रामामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याची शौर्यगाथा खऱ्या अर्थाने परिपूर्ण झाली.'          ‌                                    प्राचार्य डॉ. रोडे यांनी आपल्या समयोचित भाषणातून विविध घटना प्रसंग यांचे मुद्देसूद विश्लेषण केले .        गेल्या आठवडाभरात विविध मान्यवर वक्त्यांनी हैदराबादच्या लढ्यावर वेगवेगळ्या अंगांनी प्रकाश टाकला. सर्वश्री पं. रमेश ठाकूर ,प्रा. अर्जुनराव  सोमवंशी , पंडित शिवकुमार शास्त्री, डॉ. मंजुलता विद्यार्थी , प्राचार्य देवदत्त तुंगार , सुभाष अष्टीकर आदींनी आपल्या विषयांवर अतिशय मार्मिक विवेचन केले. दररोज व्याख्यानांपूर्वी  भजनोपदेशक  पंडित भानुप्रकाश शास्त्री   भजने सादर  केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सभेचे मंत्री श्री राजेंद्र दिवे , आर्यवीर दल अधिष्ठाता व्यंकटेश हालिंगे व डॉ. नयनकुमार आचार्य यांनी केले .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या