मोठ्या संख्येने उपस्थित रहा....

इमेज
द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आज आयोजन परळी वैजनाथ | प्रतिनिधी द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालय, परळी वैजनाथ यांच्या वतीने २० वे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे स्नेहसंमेलन आज  बुधवार, दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे  नटराज रंग मंदिर, परळी वैजनाथ येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामलिंग राजनळे सर (माजी मुख्याध्यापक, वैद्यनाथ विद्यालय) राहणार असून उद्घाटन  गणेश गिरी (गटशिक्षणाधिकारी, गटसाधन केंद्र, परळी वै.) यांच्या हस्ते होणार आहे. या काकार्यक्रमास बाजीराव  भैय्या   धर्माधिकारी (माजी नगराध्यक्ष),  कोकणे  (विस्ताराधिकारी),  धनंजय ढोणे  (पोलीस निरीक्षक),  दिवाकर जोशी (गझलकार), प्रा. रविंद्र जोशी सर (पत्रकार,  दैनिक पुढारी),  व्यंकटेश शिंदे (नगरसेवक) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.           स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचे नृत...

MB NEWS:आर्य समाजामुळे हैदराबाद संग्रामास पूर्णत्व प्राप्त झाले"---------अभ्यासक डॉ सोमनाथ रोडे यांचे प्रतिपादन.

 आर्य समाजामुळे हैदराबाद संग्रामास पूर्णत्व प्राप्त झाले -अभ्यासक डॉ. सोमनाथ रोडे यांचे प्रतिपादन    


     
                               परळी वैजनाथ ,दि.१८-.                निजामाच्या जुलमी राजवटीतून सामान्य जनतेला मुक्त करण्यासाठी आर्य समाजाने जो संघर्षमय लढा दिला, तो अतिशय जाज्वल्य असून युगानुयुगांपर्यंत प्रेरणा देत राहील. आर्य समाजाच्या बलिदानामुळे हैदराबादच्या क्रांतिकारी लढ्यास पूर्णत्व प्राप्त झाले, असे उद्गार प्रसिद्ध इतिहासतज्ञ प्राचार्य डॉ सोमनाथ रोडे यांनी काढले .            महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभेच्या वतीने गेल्या सप्ताहभर चाललेल्या "हैदराबाद संग्रामातील आर्यांची शौर्यगाथा" या वेबिनार व्याख्यानमालेच्या समारोपात काल(दि.१७) श्री रोडे प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते.  अध्यक्षस्थानी आर्य सभेचे प्रधान श्री योगमुनीजी हे होते .                                             आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून श्री रोडे यांनी आर्यसमाजाच्या क्रांतिकारी चळवळीचा इतिहास विशद केला. ते म्हणाले ,' आर्य समाजाची चळवळ ही सर्वव्यापी होती. धार्मिक ,सामाजिक आणि राष्ट्रीय स्वातंत्र्य अशा तिन्ही पैलूवर  क्रांतिकारकांनी लढा दिला. यासाठी हजारो आर्यनेते    उत्तर भारतातून आले. त्यांनी हैदराबादच्या भूमीत स्वातंत्र्य संग्रामासाठी फार मोठे वातावरण निर्माण केले .अनेकांनी स्वसुखाची  पर्वा न करता प्राण तळहाती घेऊन मोठ्या धैर्याने हा संग्राम लढला. परिणामी भारतीय लष्कराला हैदराबाद संस्थान भारतात विलीन करणे शक्य झाले.    या संग्रामामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याची शौर्यगाथा खऱ्या अर्थाने परिपूर्ण झाली.'          ‌                                    प्राचार्य डॉ. रोडे यांनी आपल्या समयोचित भाषणातून विविध घटना प्रसंग यांचे मुद्देसूद विश्लेषण केले .        गेल्या आठवडाभरात विविध मान्यवर वक्त्यांनी हैदराबादच्या लढ्यावर वेगवेगळ्या अंगांनी प्रकाश टाकला. सर्वश्री पं. रमेश ठाकूर ,प्रा. अर्जुनराव  सोमवंशी , पंडित शिवकुमार शास्त्री, डॉ. मंजुलता विद्यार्थी , प्राचार्य देवदत्त तुंगार , सुभाष अष्टीकर आदींनी आपल्या विषयांवर अतिशय मार्मिक विवेचन केले. दररोज व्याख्यानांपूर्वी  भजनोपदेशक  पंडित भानुप्रकाश शास्त्री   भजने सादर  केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सभेचे मंत्री श्री राजेंद्र दिवे , आर्यवीर दल अधिष्ठाता व्यंकटेश हालिंगे व डॉ. नयनकुमार आचार्य यांनी केले .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....