इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:आर्य समाजामुळे हैदराबाद संग्रामास पूर्णत्व प्राप्त झाले"---------अभ्यासक डॉ सोमनाथ रोडे यांचे प्रतिपादन.

 आर्य समाजामुळे हैदराबाद संग्रामास पूर्णत्व प्राप्त झाले -अभ्यासक डॉ. सोमनाथ रोडे यांचे प्रतिपादन    


     
                               परळी वैजनाथ ,दि.१८-.                निजामाच्या जुलमी राजवटीतून सामान्य जनतेला मुक्त करण्यासाठी आर्य समाजाने जो संघर्षमय लढा दिला, तो अतिशय जाज्वल्य असून युगानुयुगांपर्यंत प्रेरणा देत राहील. आर्य समाजाच्या बलिदानामुळे हैदराबादच्या क्रांतिकारी लढ्यास पूर्णत्व प्राप्त झाले, असे उद्गार प्रसिद्ध इतिहासतज्ञ प्राचार्य डॉ सोमनाथ रोडे यांनी काढले .            महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभेच्या वतीने गेल्या सप्ताहभर चाललेल्या "हैदराबाद संग्रामातील आर्यांची शौर्यगाथा" या वेबिनार व्याख्यानमालेच्या समारोपात काल(दि.१७) श्री रोडे प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते.  अध्यक्षस्थानी आर्य सभेचे प्रधान श्री योगमुनीजी हे होते .                                             आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून श्री रोडे यांनी आर्यसमाजाच्या क्रांतिकारी चळवळीचा इतिहास विशद केला. ते म्हणाले ,' आर्य समाजाची चळवळ ही सर्वव्यापी होती. धार्मिक ,सामाजिक आणि राष्ट्रीय स्वातंत्र्य अशा तिन्ही पैलूवर  क्रांतिकारकांनी लढा दिला. यासाठी हजारो आर्यनेते    उत्तर भारतातून आले. त्यांनी हैदराबादच्या भूमीत स्वातंत्र्य संग्रामासाठी फार मोठे वातावरण निर्माण केले .अनेकांनी स्वसुखाची  पर्वा न करता प्राण तळहाती घेऊन मोठ्या धैर्याने हा संग्राम लढला. परिणामी भारतीय लष्कराला हैदराबाद संस्थान भारतात विलीन करणे शक्य झाले.    या संग्रामामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याची शौर्यगाथा खऱ्या अर्थाने परिपूर्ण झाली.'          ‌                                    प्राचार्य डॉ. रोडे यांनी आपल्या समयोचित भाषणातून विविध घटना प्रसंग यांचे मुद्देसूद विश्लेषण केले .        गेल्या आठवडाभरात विविध मान्यवर वक्त्यांनी हैदराबादच्या लढ्यावर वेगवेगळ्या अंगांनी प्रकाश टाकला. सर्वश्री पं. रमेश ठाकूर ,प्रा. अर्जुनराव  सोमवंशी , पंडित शिवकुमार शास्त्री, डॉ. मंजुलता विद्यार्थी , प्राचार्य देवदत्त तुंगार , सुभाष अष्टीकर आदींनी आपल्या विषयांवर अतिशय मार्मिक विवेचन केले. दररोज व्याख्यानांपूर्वी  भजनोपदेशक  पंडित भानुप्रकाश शास्त्री   भजने सादर  केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सभेचे मंत्री श्री राजेंद्र दिवे , आर्यवीर दल अधिष्ठाता व्यंकटेश हालिंगे व डॉ. नयनकुमार आचार्य यांनी केले .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!