इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:पत्रकार संतोष पवार यांच्या मृत्यूची चौकशी करा* *एस.एम.देशमुख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी*

 *पत्रकार संतोष पवार यांच्या मृत्यूची चौकशी करा* 

*एस.एम.देशमुख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी* 



मुंबई : माथेरानचे पत्रकार संतोष पवार यांचा मृत्यू सरकारी यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झालेला असल्याने त्याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाव्दारे केली आहे.. संतोष पवार यांच्या कुटुंबियांना सरकारने पन्नास लाख रूपयांची मदत करावी अशी मागणी देखील देशमुख यांनी केली आहे..

मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 

संतोष पवार यांना सकाळी श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानंतर त्यांना कर्जत येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले.. मात्र तेथे व्हेंटिलेटर नसल्याने त्यांना डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये नेण्याचे ठरले. 108 क्रमांकांच्या अ‍ॅम्ब्युलन्समधून त्यांना घेऊन जात असताना ऑक्सिजन संपला, मात्र नवीन सिलेंडर स्टाफला लावता आले नाही आणि संतोष पवार यांचं निधन झाले.. केवळ सरकारी यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे त्यांचं निधन झाल्याने या प्रकरणाची चौकशी करून जबाबदार व्यक्तींना कठोर शासन व्हावं अशी मागणी करण्यात आली आहे..

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुलढाणा येथील कार्यक्रमात बोलताना कोरोनानं निधन झालेल्या पत्रकारास पन्नास लाख रूपयांची मदतीची घोषणा केली होती.. त्यानुसार संतोष पवार यांच्या कुटुंबियांना देखील पन्नास लाख रूपयांची मदत मिळावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे..

३१ जुलै नंतर राज्यात कोरोनानं १४ पत्रकारांचं निधन झालं आहे, २५ पेक्षा जास्त पत्रकारांवर उपचार सुरू आहेत आणि 250 पेक्षा जास्त पत्रकारांना कोरोनाची बाधा झालेली आहे.. ही संख्या सातत्यानं वाढत असल्याने सरकारने पत्रकारांच्या उपचाराची विशेष व्यवस्था करावी अशी मागणी देखील निवेदनात करण्यात आली आहे..

निवेदनावर विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी आदिंच्या स्वाक्षरया आहेत...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!