दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS: मंजुश्री घोणे यांनी लिहिलेला विशेष लेख- मी अबला नाही तर सबला आहे

 मी अबला नाही तर सबला आहे

   -------------------------------------------------------------------


    मी अबला नाही तर सबला आहे




- •
मंजुश्री सुरेश घोणे

 "यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता"अशी स्त्री यांची महती गाणारी आमची भारतीय संस्कृती !याच संस्कृतीची दयनीय स्थिती झाल्याचा प्रत्यय वर्तमानपत्रे चाळताना आम्हाला तुम्हाला येताना दिसतोय.. 

-----------------------------------------------------------------------------




"यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता"

अशी स्त्री यांची महती गाणारी आमची भारतीय संस्कृती !

याच संस्कृतीची दयनीय स्थिती झाल्याचा प्रत्यय वर्तमानपत्रे चाळताना आम्हाला तुम्हाला येताना दिसतोय.. 

आता आजचाच घ्या. आजच्या वर्तमानपत्रात पुन्हा एकदा बलात्काराची बातमी वाचली. 

बलात्कार ही देशातील एक मोठी समस्या झाली आहे.

नुकताच दिल्लीतिल ताईला न्याय मिळाला. आणि हैदराबादची घटना समोर आली. हैदराबादच्या ताईलाही न्याय मिळाला. आणि आताही मध्यप्रदेश मधली निशब्द घटना...

दिल्लीतील घटनेनंतर काही महाभागांनी यावर उपाय सुचवले.

मिरची पावडर आणि चाकू काहींनी तर मुलींचे कपडे जबाबदार ठरवले..

एखादी मुलगी तिच्या आवडीचे कपडे घालून रस्त्यावरून जात ही असेल हो. पण इतरांना तिच्यावर बलात्कार करण्याचा काय अधिकार..? या प्रश्नाचं उत्तर कोणी देऊ शकेल का..

अहो.. दिल्लीची ताई आपलं काम करून घरी जात होती. 

हैदराबादची प्रियंका ताई तर डॉक्टर होती. ती देखील आपलं काम करून घरी जात होती. 

आणि मध्य प्रदेशची मनीषाताई तर आईसोबत कामावर गेली होती... 

आता या तिन्ही घटनेमध्ये कपड्यांचा विषय आहे का हो.. 

या सर्व घटनांना दोन गोष्टी कारणीभूत आहेत. १) पुरुषांची वासना २) स्त्रियांना दिलेले दुय्यम स्थान...  

बलात्कार केल्यानंतर आपण पकडलो गेलो, तरी पोलिसांना मॅनेज करू शकू अशी मानसिकता गुन्हेगारांची झाली आहे. कायद्याची भीती राहिलेली नाही. पोलिसांचा वचक राहिलेला नाही. 

९०% लोक #justiceforManisha लिहीत आहेत.. दिल्ली, हैदराबाद, मध्यप्रदेश च्या घटना नाही अशा हजारो घटना आपल्या भारत देशात रोज घडत असतात. काही आपल्याला माहीत होतात. काही माहीत होत नाहीत. 

या एका मागील एक घटनेनंतर बलात्कार टाळण्यासाठी कोणत्याही हत्यारा शिवाय.. मिरची पावडर चाकू किंवा बंदूक.. योग्यवेळी वापर करण्याची हिंमत असावी लागते तसेच ते त्या वेळेस सुचाव ही लागतं.. 

जोपर्यंत परस्त्री ही मातेसमान अशी समाजाची मानसिकता होत नाही तोपर्यंत स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांची समस्या कायम राहील. स्त्रियांनी आपल्या संरक्षणाची काळजी स्वतः घ्यावी. कोणी मदतीला येईल आणि आपले रक्षण करेल ही भ्रामक कल्पना न करता अन्यायाचा प्रतिकार करायला शिकले पाहिजे. समाजातील एकूण चित्र पाहिले तर आजची स्त्री अद्यापही सुरक्षित नाही एवढे मात्र खरे आहे. ‌

यावर आता फक्त एकच उपाय

*#मी अबला नाही तर सबला आहे*


     - मंजुश्री सुरेश घोणे*

         परभणी

         मो. ९४२०८८४०४१

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....