इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS: मंजुश्री घोणे यांनी लिहिलेला विशेष लेख- मी अबला नाही तर सबला आहे

 मी अबला नाही तर सबला आहे

   -------------------------------------------------------------------


    मी अबला नाही तर सबला आहे




- •
मंजुश्री सुरेश घोणे

 "यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता"अशी स्त्री यांची महती गाणारी आमची भारतीय संस्कृती !याच संस्कृतीची दयनीय स्थिती झाल्याचा प्रत्यय वर्तमानपत्रे चाळताना आम्हाला तुम्हाला येताना दिसतोय.. 

-----------------------------------------------------------------------------




"यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता"

अशी स्त्री यांची महती गाणारी आमची भारतीय संस्कृती !

याच संस्कृतीची दयनीय स्थिती झाल्याचा प्रत्यय वर्तमानपत्रे चाळताना आम्हाला तुम्हाला येताना दिसतोय.. 

आता आजचाच घ्या. आजच्या वर्तमानपत्रात पुन्हा एकदा बलात्काराची बातमी वाचली. 

बलात्कार ही देशातील एक मोठी समस्या झाली आहे.

नुकताच दिल्लीतिल ताईला न्याय मिळाला. आणि हैदराबादची घटना समोर आली. हैदराबादच्या ताईलाही न्याय मिळाला. आणि आताही मध्यप्रदेश मधली निशब्द घटना...

दिल्लीतील घटनेनंतर काही महाभागांनी यावर उपाय सुचवले.

मिरची पावडर आणि चाकू काहींनी तर मुलींचे कपडे जबाबदार ठरवले..

एखादी मुलगी तिच्या आवडीचे कपडे घालून रस्त्यावरून जात ही असेल हो. पण इतरांना तिच्यावर बलात्कार करण्याचा काय अधिकार..? या प्रश्नाचं उत्तर कोणी देऊ शकेल का..

अहो.. दिल्लीची ताई आपलं काम करून घरी जात होती. 

हैदराबादची प्रियंका ताई तर डॉक्टर होती. ती देखील आपलं काम करून घरी जात होती. 

आणि मध्य प्रदेशची मनीषाताई तर आईसोबत कामावर गेली होती... 

आता या तिन्ही घटनेमध्ये कपड्यांचा विषय आहे का हो.. 

या सर्व घटनांना दोन गोष्टी कारणीभूत आहेत. १) पुरुषांची वासना २) स्त्रियांना दिलेले दुय्यम स्थान...  

बलात्कार केल्यानंतर आपण पकडलो गेलो, तरी पोलिसांना मॅनेज करू शकू अशी मानसिकता गुन्हेगारांची झाली आहे. कायद्याची भीती राहिलेली नाही. पोलिसांचा वचक राहिलेला नाही. 

९०% लोक #justiceforManisha लिहीत आहेत.. दिल्ली, हैदराबाद, मध्यप्रदेश च्या घटना नाही अशा हजारो घटना आपल्या भारत देशात रोज घडत असतात. काही आपल्याला माहीत होतात. काही माहीत होत नाहीत. 

या एका मागील एक घटनेनंतर बलात्कार टाळण्यासाठी कोणत्याही हत्यारा शिवाय.. मिरची पावडर चाकू किंवा बंदूक.. योग्यवेळी वापर करण्याची हिंमत असावी लागते तसेच ते त्या वेळेस सुचाव ही लागतं.. 

जोपर्यंत परस्त्री ही मातेसमान अशी समाजाची मानसिकता होत नाही तोपर्यंत स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांची समस्या कायम राहील. स्त्रियांनी आपल्या संरक्षणाची काळजी स्वतः घ्यावी. कोणी मदतीला येईल आणि आपले रक्षण करेल ही भ्रामक कल्पना न करता अन्यायाचा प्रतिकार करायला शिकले पाहिजे. समाजातील एकूण चित्र पाहिले तर आजची स्त्री अद्यापही सुरक्षित नाही एवढे मात्र खरे आहे. ‌

यावर आता फक्त एकच उपाय

*#मी अबला नाही तर सबला आहे*


     - मंजुश्री सुरेश घोणे*

         परभणी

         मो. ९४२०८८४०४१

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या