इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS: मंजुश्री घोणे यांनी लिहिलेला विशेष लेख- मी अबला नाही तर सबला आहे

 मी अबला नाही तर सबला आहे

   -------------------------------------------------------------------


    मी अबला नाही तर सबला आहे




- •
मंजुश्री सुरेश घोणे

 "यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता"अशी स्त्री यांची महती गाणारी आमची भारतीय संस्कृती !याच संस्कृतीची दयनीय स्थिती झाल्याचा प्रत्यय वर्तमानपत्रे चाळताना आम्हाला तुम्हाला येताना दिसतोय.. 

-----------------------------------------------------------------------------




"यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता"

अशी स्त्री यांची महती गाणारी आमची भारतीय संस्कृती !

याच संस्कृतीची दयनीय स्थिती झाल्याचा प्रत्यय वर्तमानपत्रे चाळताना आम्हाला तुम्हाला येताना दिसतोय.. 

आता आजचाच घ्या. आजच्या वर्तमानपत्रात पुन्हा एकदा बलात्काराची बातमी वाचली. 

बलात्कार ही देशातील एक मोठी समस्या झाली आहे.

नुकताच दिल्लीतिल ताईला न्याय मिळाला. आणि हैदराबादची घटना समोर आली. हैदराबादच्या ताईलाही न्याय मिळाला. आणि आताही मध्यप्रदेश मधली निशब्द घटना...

दिल्लीतील घटनेनंतर काही महाभागांनी यावर उपाय सुचवले.

मिरची पावडर आणि चाकू काहींनी तर मुलींचे कपडे जबाबदार ठरवले..

एखादी मुलगी तिच्या आवडीचे कपडे घालून रस्त्यावरून जात ही असेल हो. पण इतरांना तिच्यावर बलात्कार करण्याचा काय अधिकार..? या प्रश्नाचं उत्तर कोणी देऊ शकेल का..

अहो.. दिल्लीची ताई आपलं काम करून घरी जात होती. 

हैदराबादची प्रियंका ताई तर डॉक्टर होती. ती देखील आपलं काम करून घरी जात होती. 

आणि मध्य प्रदेशची मनीषाताई तर आईसोबत कामावर गेली होती... 

आता या तिन्ही घटनेमध्ये कपड्यांचा विषय आहे का हो.. 

या सर्व घटनांना दोन गोष्टी कारणीभूत आहेत. १) पुरुषांची वासना २) स्त्रियांना दिलेले दुय्यम स्थान...  

बलात्कार केल्यानंतर आपण पकडलो गेलो, तरी पोलिसांना मॅनेज करू शकू अशी मानसिकता गुन्हेगारांची झाली आहे. कायद्याची भीती राहिलेली नाही. पोलिसांचा वचक राहिलेला नाही. 

९०% लोक #justiceforManisha लिहीत आहेत.. दिल्ली, हैदराबाद, मध्यप्रदेश च्या घटना नाही अशा हजारो घटना आपल्या भारत देशात रोज घडत असतात. काही आपल्याला माहीत होतात. काही माहीत होत नाहीत. 

या एका मागील एक घटनेनंतर बलात्कार टाळण्यासाठी कोणत्याही हत्यारा शिवाय.. मिरची पावडर चाकू किंवा बंदूक.. योग्यवेळी वापर करण्याची हिंमत असावी लागते तसेच ते त्या वेळेस सुचाव ही लागतं.. 

जोपर्यंत परस्त्री ही मातेसमान अशी समाजाची मानसिकता होत नाही तोपर्यंत स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांची समस्या कायम राहील. स्त्रियांनी आपल्या संरक्षणाची काळजी स्वतः घ्यावी. कोणी मदतीला येईल आणि आपले रक्षण करेल ही भ्रामक कल्पना न करता अन्यायाचा प्रतिकार करायला शिकले पाहिजे. समाजातील एकूण चित्र पाहिले तर आजची स्त्री अद्यापही सुरक्षित नाही एवढे मात्र खरे आहे. ‌

यावर आता फक्त एकच उपाय

*#मी अबला नाही तर सबला आहे*


     - मंजुश्री सुरेश घोणे*

         परभणी

         मो. ९४२०८८४०४१

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!