प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS:नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये कोरोनापासून सावधानता बाळगावी-प्रकाश सामत

 नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये

कोरोनापासून सावधानता बाळगावी-प्रकाश सामत 



परळी, (प्रतिनिधी):- बीड जिल्ह्यासह परळी तालुक्यात दिवसांन दिवस कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. या मुळे परिस्थिती चिंताजनक झाली आहे. नागरिकांनी विनाकारण, विना मस्क घराबाहेर पडू नये प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करून सकारत्मक प्रयत्नाने कोरोनाला हद्दपार करावे असे आवाहन भाजपा जेष्ठ नेते तथा उद्योजक प्रकाश सामत यांनी केले आहे. 

           परळी शहरातील कोरोना बाधितांची संख्या गंभीर स्थितीत पोहचली असतानाही अनेक जण शहरात विनाकारण, विनामास्क  फिरत आहेत. त्यांनी आपली स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घेऊन कोरोना पासून बचाव करावा गर्दीच्या ठिकणी जाणे टाळावे, सोशल डिस्टर्सिंगचे काटेकोर पालन करावे. 

        शहरातील सर्व फेरीवाले विक्रेते, व्यापारी वर्गानेही स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊन ग्राहकांनाही सुरक्षित ठेवावे सॅनिटायझरचा वापर वारंवार करावा प्रशासन कोरोना विरुद्ध मोठ्या प्रमाणात लढा देत आहे. परंतु नागरिकांनी सुद्धा स्वतःहून यात सकारत्मक सहभाग घेतल्या शिवाय प्रशासनाचे सर्व प्रयत्न अपुरे ठरत असून त्यामुळे कोरोनाचा प्रभाव वाढतच आहे. 

               कोरोनाची साखळी तोडायची असेलतर पण सर्व नागरिकांनी एकत्रित येऊन प्रशासनास सहकार्य करून आपली व आपल्या कुटुंबाची योग्य काळजी घेऊन कोरोनाला रोखू शकतो असे प्रकाश सामत यांनी म्हटले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या