परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS:*पिक नुकसानीचे पंचनामे 48 तासात पूर्ण करण्याचे निर्देश--- मंत्री अमित देशमुख*

 *पिक नुकसानीचे पंचनामे 48 तासात पूर्ण करण्याचे निर्देश--- मंत्री अमित देशमुख*


*खांडवी येथे शेतात जाऊन केली पाह




बीड, (जिमाका) दि. २०::--राज्यात अतिवृष्टीच्या पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले असून अजूनही पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. या नुकसानीचे पंचनामे 48 तासात पूर्ण करून प्रस्ताव सादर राज्य शासनास सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी केले.


गेवराई तालुक्यातील खांडवी येथे भेट देऊन मंत्री श्री अमित देशमुख यांनी मुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, माजी आमदार अमरसिंह पंडित, राजकिशोर मोदी, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, तहसीलदार सचिन खाडे आदी उपस्थित होते. 


वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री देशमुख म्हणाले, परतीच्या पावसामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे बराच ठिकाणी 130 ते दोनशे टक्क्यापर्यंत जास्त पाऊस झाल्याने शेत पिकांबरोबरच खाजगी व सार्वजनिक मालमत्तेचे देखील राज्यात नुकसान झालेले आहे यासाठी केंद्र सरकार कडून मदत व्हावी म्हणून प्रस्ताव पाठविण्यात आले असून राज्य सरकार शेतकऱ्यांना या नुकसानी मध्ये मदत करण्यासाठी पुढे आलेले आहे राज्य शासनाने गांभीर्याने अतिवृष्टीच्या नैसर्गिक आपत्ती कडे पाहताना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतली आहे असे मंत्री महोदय म्हणाले

        ते म्हणाले, तातडीची मदत करण्याची होणारी मागणी विचारात घेता मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत राज्य शासन निर्णय घेतला जाईल. तसेच नुकसानीचा अहवाल केंद्र सरकारला देखील सादर करण्यात येईल, असे मंत्री श्री देशमुख यांनी सांगितले.



*खांडवी येथे शेतात जाऊन मंत्री देशमुख यांनी केली पाहणी*

गेवराई तालुक्यातील खांडवी येथे आज वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी वसंत हरिभाऊ शिंदे या वयोवृद्ध शेतकऱ्यास धीर दिला यावेळी त्यांच्या कापसाच्या शेतात साचलेल्या पाण्यामुळे हातात आलेले पीक वाया गेल्याची भावना शेतकरी शिंदे यांनी बोलून दाखविली. तसेच यावेळी तूर आणि सोयाबीन ही पिके देखील अति पावसामुळे वाया गेल्याचे त्यांना दिसून आले.

००००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!