प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS:शासनाच्या सर्व लाभार्थी योजनेसाठी जेष्ठ वयोमर्यादा65वरून 55करावी -प्रेमनाथ कदम

 शासनाच्या सर्व लाभार्थी योजनेसाठी जेष्ठ वयोमर्यादा65वरून 55करावी -प्रेमनाथ कदम .   

         


सामाजिक न्यायमंत्री ना.मुंडेना निवेदन द्वारे  मागणी


परळी (प्रतिनिधी) राज्यातील जेष्ठ नागरिकांना शासनातर्फे विविध योजनेव्दारे लाभ दिला जातो व त्यासाठीजेष्ठ नागरिकांचे वय 65 वर्ष ठरवले गेले आहे मात्र हि वयोमर्यादा जाचक असुन याचा फटका राज्यातील असंख्य 55 वर्ष वय असणाऱ्यां जेष्ठ नागरिकांनां बसत असुन शासनाने सर्व योजनेचा लाभाची वयोमर्यादा 55वर्ष करावी अशी मागणी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या कडे दिनांक 11/10/2020 रोजी एका निवेदनाव्दारे सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार प्रेमनाथ कदम यांनी केली आहे.


महाराष्ट्र सरकारने राज्यातील अनेक गरजवंत घटकासाठी विशेष सहाय्य योजना सुरू केल्या असुन त्यात जेष्ठ नागरिकांसाठी असलेल्या श्रावणबाळ योजना,संजय गांधी निराधार योजना व महाराष्ट्र राज्य परिवहनच्या बसने प्रवासात सवलत योजनेचा लाभ घेणाऱ्यालाव65 वर्ष ठेवली आहे.आजच्या धकाधकीच्या काळात खाण,पान,व राहणीमानाचा परिणाम जिवनावर होत असल्याने नागरिकांचे आयुष्यमान कमी होत आहेम्हणुन 65वर्षा नंतर शासनाच्या या योजनेचा लाभ जेष्ठ नागरिकांना घेण्यास जाचक ठरत आहे. 

या विषयावर मागील सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांनी विधानसभेत जेष्ठांचे वय 65वर्षाहुन 60 वर्ष करण्यात येत असल्याची घोषणा केली होती मात्र या 60 वर्ष वय असणाऱ्या जेष्ठ नागरिकांना श्रावणबाळ योजना,  संजय गांधी निराधार योजना वबस भाड्यात सवलत योजनेतुन मिळणाऱ्या लाभापासुन वगळण्यात आले होते.

यासाठी 55वर्ष वय असणाऱ्यांना जेष्ठ नागरिक घोषीत करून त्यांना शासनातर्फे मिळणाऱ्या श्रावणबाळ योजना ,संजय गांधी निराधार योजना व बस प्रवासात बस भाड्यात सवलत तसेच इतर मिळणाऱ्या लाभाचें लाभार्थी बनवावे अशा मागणीचे निवेदनराज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांना सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार प्रेमनाथ कदम यांनी समक्ष दिले आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या