दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS:परळीची जलसंजीवनी असलेला वाण प्रकल्प भरल्याने समाधानी* *धनंजय मुंडे यांनी वाण धरणावर केले जलपूजन*

 *परळीची जलसंजीवनी असलेला वाण प्रकल्प भरल्याने समाधानी*


 *धनंजय मुंडे यांनी वाण धरणावर केले जलपूजन*




*जायकवाडीचे पाणी आणणे हे आपले ध्येय - धनंजय मुंडे*


परळी (दि. १०) ---- : परळी शहरासह तालुक्याची जलसंजीवणी असलेले वाण धरण जवळपास चार वर्षानंतर पूर्ण क्षमतेने भरले असून यामुळे तालुक्याची तहान भागणार असून सिंचनासाठीही मुबलक पाणी उपलब्ध झाल्याने समाधान वाटत असल्याचे परळीचे आमदार तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. 


वाण धरणाच्या तीरावर ना. मुंडेंच्या हस्ते विधिवत जलपूजन संपन्न झाले व आरती करण्यात आली; यावेळी आ. संजय दौंड, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, नगर परिषदेचे गटनेते वाल्मिक अण्णा कराड, जि. प. गटनेते अजय मुंडे, युवक नेते अभय मुंडे, दिपक नाना देशमुख, बाजीराव भैय्या धर्माधिकारी, शरदभाऊ मुंडे, भाऊड्या कराड, मोहन सोळंके, सूर्यभान मुंडे, उपसभापती पिंटू मुंडे, अंबाजोगाईचे सभापती प्रशांत जगताप , रवी मुळे, विनोद जगतकर, वैजूअण्णा बागवाले, नाथ प्रतिष्ठानचे सचिव नितीन मामा कुलकर्णी, तहसीलदार विपीन पाटील, न.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद मुंडे, जलसंपदा विभागाचे अभियंता सिरसाट, गुलभिले यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.


यावर्षी वाण धरण भरल्याने  परळी व परिसरातील गावांच्या  पिण्याच्या पाण्याचा प्रश्न  संपला असला तरी  भविष्यात  दुष्काळामुळे  वान धरण कोरडे पडल्यास  परळी शहराला पाणी टंचाई भासू नये यासाठी नाथरा फाटा येथून जाणाऱ्या माजलगाव कालव्याला पाईपलाईन करून जायकवाडी चे पाणी वाण धरणात आणणे हा आपला प्रयत्न असून, यासाठी जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांच्या सोबत नुकतीच एक बैठक घेतली आहे. 


वाण धरणासाठी जायकवाडी चे पाणी आरक्षित करण्यात यावे याबाबतही आपण मागणी केली असून, हे पूर्ण झाल्यास परळीचा पाणीप्रश्न कायमचा मिटेल असेही यावेळी बोलताना ना. मुंडे म्हणाले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....