प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS:मराठा आरक्षणाचा मुळ विषय बाजुला करुन सरकार पळवाट काढतय का?- शिवाजी शिंदे

 मराठा आरक्षणाचा मुळ विषय बाजुला करुन सरकार पळवाट काढतय का?- शिवाजी शिंदे



*दा.वडगावचे साखळी धरणे चौथ्या  सुरुच*


परळी वै....

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजेत या मुळ मागणीसाठी संपुर्ण समाज रस्त्यावर उतरलेला संपुर्ण देशाने पाहिला.याची नोंद जागतिक स्तरावरही झाली परंतु सरकार मराठ्याच्या मुळ आरक्षणाच्या मागणीला बगल देत असल्याचे दिसुन येत आहे.सुप्रिम काॕर्टाने मराठा आरक्षणावर जी स्थगिती दिली ती कशी उठवता येईल हे न पाहता इतर गोष्टी पुढे करुन वेळकाढु पणा करत असल्याचा आरोप दा.वडगाचे शिवाजीराव शिंदे यांनी केला.

परळी तालुक्यातील मौजे दा.वडगाव येथे गेल्या चार दिवसा पासुन गावकरी साखळी धरणे आंदोलन करत आहेत.दा.वडगावच्या अकरा विद्यार्थ्यांनी एसईबीसी च्या कोट्यातुन परिक्षा दिल्या ते पाञ ही झाले आॕर्डर ही मिळणार होत्या परंतु आरक्षणाच्या स्थगितीमुळे हे पाञ विद्यार्थ्यांचे काय करायचे असा सवाल गावकरी उपस्थित करित आहेत.आमचा मुळ प्रश्न मराठा आरक्षणाचा असताना वेळ काढु पणा करत राज्य सरकारने ख-या अर्थाने mpsc च्या परिक्षा रद्द करुन पुन्हा एकदा प्रश्न निर्माण केला आहे.हे पाञ ठरलेले अकरा विद्यार्थी सामान्य कुटुंबातील असुन काही विद्यार्थींचे नौकरीसाठी लागणाऱ्या  वय निघुन जात आहे म्हणुन संपुर्ण गाव या साखळी धरणे आंदोलनात राञंदिवस सहभाग नोंदवत आहे.जो पर्यत आरक्षण मिळणार नाही तो पर्यत हे आंदोलन चालुच राहणार असल्याचे आंदोलक सांगत आहे.

यावेळी शिवाजी शिंदे,भास्कर शिंदे, पद्मजा शिंदे पूजा शिंदे,स्वाती आमले अदीनी आपली मनोगत व्यक्त केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या