इमेज
  ग्लोबल विकास ट्रस्ट आणि परळी नगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम; पथनाट्यातून दिला वृक्षसंगोपनाचा संदेश परळी वैजनाथ (प्रतिनिधी) पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंगोपनाचा प्रभावी संदेश देण्यासाठी परळी शहरात आज एका विशेष जनजागृतीपर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. ग्लोबल विकासच ट्रस्ट, नगरपालिका प्रशासन आणि स्थानिक वृक्षसंवर्धन चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आज, शुक्रवार २६ जून रोजी शहरातील प्रमुख आणि गजबजलेल्या भागात या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये मोंढा मार्केट, बस स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि नेहरू चौक तळ परिसराचा समावेश होता. या पथनाट्याला परळीकरांनी प्रचंड गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नाट्यातून दिला 'झाडे लावा, झाडे जगवा'चा संदेश वाढते प्रदूषण आणि निसर्गाचा बिघडत चाललेला समतोल या पार्श्वभूमीवर मानवी जीवनात वृक्षांचे काय महत्त्व आहे, हे कलाकारांनी आपल्या प्रभावी अभिनयातून मांडले. केवळ झाडे लावणे पुरेसे नसून त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज कशी बनली आहे, यावर पथनाट्यातून प्रकाश टाकण्यात आला. पाणीटंचाई, ग्लोबल वॉर्मिंग आण...

MB NEWS:मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यास टाळाटाळ कशासाठी? कालमर्यादा ठरवून सोक्षमोक्ष लावा -अमित घाडगे

 मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यास टाळाटाळ कशासाठी? कालमर्यादा ठरवून सोक्षमोक्ष लावा -अमित घाडगे 



परळी l प्रतिनिधी

मराठा आरक्षण तथा शैक्षणिक व नोकरीतील आरक्षणाच्या मुद्द्यावर परळीत 8 ऑक्टोबर रोजी मराठा क्रांती मोर्चा व सकळ मराठा समाजाच्या वतीने रोखठोक आंदोलन करण्यात आले होते. सरकार राज्य सेवा परीक्षा पुढे ढकलण्यास तयार झाल्यामुळे या आंदोलनाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. मात्र या गोष्टीची कालमर्यादा ठरवून सरकारने सोक्षमोक्ष लावावा अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक अमित घाडगे यांनी केली आहे.

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला होता. परळीत सुरु करण्यात आलेले आंदोलन काही कालावधीसाठी स्थगित करण्यात आले आहे. मराठा आंदोलनाचा निर्णय कोर्टात लवकर व्हावा यासाठी राज्य सरकारने सक्षम पाऊले उचलावीत व तातडीने उपाययोजना कराव्यात अन्यथा परळीचे आंदोलन पुन्हा सुरू करू असा इशारा त्यांनी दिला आहे. मराठा समाजासाठी आरक्षण हा अत्यंत जिव्हाळ्याचा आणि अत्यावश्यक मुद्दा आहे. नोकरी आणि शिक्षणात आरक्षण नसल्यामुळे हजारो मुलांचे नुकसान होत आहे. आरक्षण मिळाले होते परंतु सर्वोच्च न्यायालयाने त्याला अंतरिम स्थगिती दिली आहे. यामुळेच मराठा विद्यार्थ्यांच्या भविष्याचा नेमका निर्णय घेणे तात्काळ अवश्यक आहे. यासाठी राज्य सरकारने ताकदीनं कोर्टात बाजू मांडावी अशी मागणी अमित घाडगे यांनी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या