इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS:निधनवार्ता-माकपचे काॅ. बाबासाहेब सरवदे यांचे दुखःद निधन*

 *माकपचे काॅ. बाबासाहेब सरवदे यांचे  निधन*




अंबाजोगाई. प्रतिनिधी 


   माकपचे जेष्ठ नेते काॅ. बाबासाहेब सरवदे यांचे रविवारी सायंकाळी साडेसात वाजता अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात निधन झाले. मागील वर्षभरापासून कर्करोगाशी झुंज देत होते. 

    विद्यार्थी दशेपासुन एसएफआय या संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर अनेक आंदोलनाचे नेतृत्व केले. शेतकरी, शेतमजूरांच्या प्रश्नावर सतत सक्रीय राहुन त्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडण्याचे काम काॅ. बाबासाहेब सरवदे यांनी केले आहे. जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी काॅ. गंगाधरअप्पा बुरांडे यांच्या विचाराचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. शेतमजूर संघटनेवर त्यांनी अनेक वर्षे काम केले. शेतमजूर युनियनचे राज्याचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यांचे दहावी पर्यंतचे शिक्षण महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा येथे झाले होते. मागील पंधरा वर्षांपासून पासुन त्या संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम पहात होते.  

काॅ. बाबासाहेब सरवदे हे मागील एक वर्षा पासुन कर्करोगाशी झुंज देत होते. रविवार दि. 18 रोजी सायंकाळी साडेसात वाजता अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 60 वर्ष होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, एक मुलगा, जावई व नातु असा परिवार आहे. काॅ. बाबासाहेब सरवदे यांच्यावर सोमवारी (ता. 19) सकाळी नऊ वाजता अंबाजोगाई येथील लालनगर येथील स्मशानभूमीत करण्यात येणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या