प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS: "उमेद'' अभियान ही लाखो महिलांची उमेद ; हे अभियान सशक्त करणे गरजेचे पण ' उमेद माउलीला' पावसात आंदोलनाची वेळ - पंकजाताई मुंडे

  "उमेद'' अभियान ही लाखो महिलांची उमेद ; हे अभियान सशक्त करणे गरजेचे पण ' उमेद माउलीला' पावसात आंदोलनाची वेळ - पंकजाताई मुंडे



परळी वैजनाथ,प्रतिनिधी......."

  "उमेद'' ही लाखो महिलांची उमेद ; हे अभियान सशक्त करणे गरजेचे पण ' उमेद माउलीला' पावसात आंदोलनाची वेळ आली आहे हे दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया पंकजाताई मुंडे यांनी दिली आहे.

  उमेद अभिमानातील महिलांचे आंदोलन सुरू आहे.पावसात हे आंदोलन झाले यावर ट्विट करून माजी ग्रामविकास, महिला व बालकल्याण मंत्री तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.त्यांनी म्हटले आहे की, "उमेद'' अभियान ही लाखो महिलांची उमेद आहे.. ग्रामीण भागात महिला स्वयंपूर्ण होऊन त्यांना आर्थिक ताकत देण्याचं काम यातून झालं आहे.. महिला पोषण, शिक्षण, स्वच्छता, बँक व्यवहार आणि सामुदायिक जवाबदारी शिकली आणि सशक्त बनली ते "उमेद" मुळे.

समाज उत्थान व महिला सक्षमीकरण साधणारे हे अभियान, या सरकारने सशक्त करायला पाहिजे.. बचतगट चळवळ ही सुदृढ करावी.. पण दुर्दैव की त्या "उमेद" च्या माउलीला कोरोना च्या गंभीर परिस्थितीत पावसात आंदोलन करावं लागत आहे. 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या