परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS:खरीप पिकांचे काढणी पश्‍चात नुकसान झाले असल्यास शेतकऱ्यांनी विमा कंपनीस कळवावे-जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

 खरीप पिकांचे काढणी पश्‍चात नुकसान झाले असल्यास शेतकऱ्यांनी विमा कंपनीस कळवावे-जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी



बीड......

      खरीप पिकांचे काढणी पश्‍चात नुकसान झाले असल्यास शेतकऱ्यांनी विमा कंपनीस कळवावे असे आवाहनजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

      

        पंतप्रधान विमा योजनेअंतर्गत खरीप पिकांचे काढणी पश्‍चात नुकसान झाले असल्यास विमा कंपनीस कळवणे आवश्यक आहे. माहे ऑक्टोबर महिन्यात बीड जिल्ह्यामध्ये सर्वत्र पाऊस होत आहे. सध्या खरीप पीक काढणी हंगाम अंतिम टप्प्यात आहे व काही शेतकऱ्यांनी पिके काढून गोळा न करता शेतात वाळवण्यासाठी ठेवलेले आहेत. मागील दोन-तीन दिवसात झालेल्या पावसामुळे सदरील पिकांचे नुकसान झाले असल्यास या शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा उतरविला आहे. त्यांनी अधिसूचित पिकांसाठी च्या अधिसूचित क्षेत्रातील शेतात कापणीपासून 14 दिवसाच्या आत गारपीट ,चक्रीवादळ , अतिवृष्टी , ढगफुटी व अवकाळी यामुळे झालेल्या नुकसानीचे वैयक्तिक स्तरावरून पंचनामे करून नुकसान ग्राह्य धरता येतात. यासाठी शेतकऱ्यांनी सदरची घटना घडल्यापासून 72 तासाच्या आत याबाबतची सूचना विमा कंपनी व कृषी विभागास देणे बंधनकारक आहे. यामध्ये नुकसान कळविताना सर्वे नंबर व नुकसान ग्रस्त क्षेत्र तपशील कळविणे बंधनकारक आहे. प्राप्त झालेल्या सूचनेनंतर संयुक्त समिती शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी करील. यामध्ये विमा कंपनी, प्रतिनिधी कृषी अधिकारी व संबंधित शेतकरी यांचा समावेश असेल. तालुकास्तरावर पिक विमा कंपनीचे प्रतिनिधी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात उपलब्ध आहेत. त्यांचे नाव व संपर्क क्रमांक खाली नमूद केले आहेत. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोर वरून क्रॉप इन्शुरन्स हे ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये आपल्या नुकसानीची माहिती द्यावी किंवा 1800 165 15 या टोल फ्री क्रमांकावर किंवा कृषी विभागाच्या कार्यालयात अर्ज करून कळवावे असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बीड यांच्या वतीने करण्यात येत आहे.

         बीड सोनवणे महेश निवृत्ती 86 0 50 680 88 आष्टी शेख शहजानपुर मुक्तार 77 21 84 01 01 पाटोदा गोल्हार संपत अश्रुबा 97 64 55 22 03 शिरूर कासार कंठाळे विशाल हरिभाऊ 82 61 94 85 88 गेवराई चिकने धनंजय जगन्नाथ 97 67 23 75 05 धारूर देशमुख व्ही आर 97 67 23 75 05 वडवणी देशमुख जीवराज भास्कर 95 95 14 28 96 माजलगाव मोरे अशोक सुखदेव 89 79 02 63 22 परळी फड नागेश्वर 90 67 97 01 80 केज केदार ओंकार लहू 94 0 58 57 777 अंबाजोगाई इ मुंडे सोपान भानुदास 90 96 60 7952

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!