इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS:जब तक दवाई नहीं, तब तक ढिलाई नहीं', पंतप्रधानांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे*

'जब तक दवाई नहीं, तब तक ढिलाई नहीं', पंतप्रधानांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे                            -----------------------------------     



नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज ६ वाजता देशातील नागरिकांना संबोधित केलं. कोरोनाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सातव्यांदा जनतेला संबोधित केलं आहे. कोरोना व्हायरस अजून गेला नाही. त्यामुळे बाजारपेठांमध्ये गर्दी करणं योग्य नाही, असं सांगत पंतप्रधानांनी आज भाषणाला सुरूवात केली.                               

*◼️ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे*                                            -----------------------------------          ⭕लॉकडाऊन गेलं असेल तरी कोरोना व्हायरस गेलेला नाही. बाजारपेठेत गर्दी वाढू लागली आहे. 

आपल्याला परिस्थिती सुधारायची आहे, बिघडवायची नाही.               -----------------------------------     

  ⭕आज देशात रिकव्हरी रेट चांगला आहे. भारतात प्रती 10 लाख लोकसंख्येत जवळपास साडे पाच हजार लोकांना कोरोना झाला आहे. अमेरिकेत हा आकडा २५ हजार आहे.

१० लाख लोकसंख्येत जवळपास मृत्यूदर हा ८३ आहे. तर अमेरिकेत हा आकडा ६०० च्या पार आहे.

आपल्याकडे १२ हजार काॅरन्टाईन सेंटर्स आहेत.

२ हजार लॅब टेस्टिंग लॅब आहेत.    

   -----------------------------------      

 ⭕टेस्टची वाढणारी संख्या ही ताकद आहे

बेफिकीर होण्याची ही वेळ नाही, काळजी घेण्याची गरज आहे.     *पकी खेती देखिके, गरब किया किसान।अजहूं झोला बहुत है, घर आवै तब जान।* याचा अर्थ आपण बेफिकीर राहू नये. कोरोना संपल्याचे समजू नये. आपल्याला लस येईपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यायची आहे. कोरोनाची लस बाजारात आल्यावर ती प्रत्येकाकडे पोहोचवण्याचा विचार केला जाईल. त्यामुळे आपली काळजी घ्या. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या