इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:जब तक दवाई नहीं, तब तक ढिलाई नहीं', पंतप्रधानांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे*

'जब तक दवाई नहीं, तब तक ढिलाई नहीं', पंतप्रधानांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे                            -----------------------------------     



नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज ६ वाजता देशातील नागरिकांना संबोधित केलं. कोरोनाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सातव्यांदा जनतेला संबोधित केलं आहे. कोरोना व्हायरस अजून गेला नाही. त्यामुळे बाजारपेठांमध्ये गर्दी करणं योग्य नाही, असं सांगत पंतप्रधानांनी आज भाषणाला सुरूवात केली.                               

*◼️ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे*                                            -----------------------------------          ⭕लॉकडाऊन गेलं असेल तरी कोरोना व्हायरस गेलेला नाही. बाजारपेठेत गर्दी वाढू लागली आहे. 

आपल्याला परिस्थिती सुधारायची आहे, बिघडवायची नाही.               -----------------------------------     

  ⭕आज देशात रिकव्हरी रेट चांगला आहे. भारतात प्रती 10 लाख लोकसंख्येत जवळपास साडे पाच हजार लोकांना कोरोना झाला आहे. अमेरिकेत हा आकडा २५ हजार आहे.

१० लाख लोकसंख्येत जवळपास मृत्यूदर हा ८३ आहे. तर अमेरिकेत हा आकडा ६०० च्या पार आहे.

आपल्याकडे १२ हजार काॅरन्टाईन सेंटर्स आहेत.

२ हजार लॅब टेस्टिंग लॅब आहेत.    

   -----------------------------------      

 ⭕टेस्टची वाढणारी संख्या ही ताकद आहे

बेफिकीर होण्याची ही वेळ नाही, काळजी घेण्याची गरज आहे.     *पकी खेती देखिके, गरब किया किसान।अजहूं झोला बहुत है, घर आवै तब जान।* याचा अर्थ आपण बेफिकीर राहू नये. कोरोना संपल्याचे समजू नये. आपल्याला लस येईपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यायची आहे. कोरोनाची लस बाजारात आल्यावर ती प्रत्येकाकडे पोहोचवण्याचा विचार केला जाईल. त्यामुळे आपली काळजी घ्या. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!