दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS:यंदाच्या शैक्षणिक वर्षात ३४ टक्के पालकांना शाळा नकोच!*

 *⭕यंदाच्या शैक्षणिक वर्षात ३४ टक्के पालकांना शाळा नकोच!*                                  

 -----------------------------------     


 मुंबई : यंदाच्या शैक्षणिक वर्षात म्हणजे मार्च / एप्रिलपर्यंत सरकारने शाळा उघडू नयेत, असे मत देशातील ३४% पालकांनी मांडले. तर ३२% पालकांनी ३१ डिसेंबर, २०२० पर्यंत शाळा न उघडण्याचा निर्णय घ्यावा, अशी प्रतिक्रिया दिली. ७% पालकांनी १ आॅक्टोबर, १२% पालकांनी १ नोव्हेंबर, तर ९% जणांनी १ डिसेंबरपासून शाळा उघडाव्यात, असे मत नोंदवले.  ‘लोकल सर्कल’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातील हे निरीक्षण आहे. सप्टेंबरमध्ये शाळा सुरू करण्यासंदर्भात याआधीही संस्थेने सर्वेक्षण केले होते. त्या वेळी २३% पालकांनी शाळा सुरू करण्यास पाठिंबा दिला होता. मात्र गेल्या काही दिवसांत वाढलेल्या कोरोना संसर्गामुळे या आकडेवारीत ३% घट दिसून आली. काही राज्यांत अटी-शर्तींचे पालन करून शाळा सुरू करण्याच्या सूचना आहेत. मात्र देशातील कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता पालकांच्या मनात धास्ती तसेच मुलांच्या सुरक्षेबाबत काळजी आहे. या सर्वेक्षणासाठी देशातील २१७ जिल्ह्यांतील १४ हजार ५०० पालकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या. सरकार शाळा सुरू करण्यासंदर्भात पालकांच्या मतांच्या, प्रतिक्रियांचा विचार करून योग्य तो निर्णय घेऊ शकेल यासाठी हा अहवाल राज्य आणि केंद्र सरकारला सादर केला जाणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....