इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS:यंदाच्या शैक्षणिक वर्षात ३४ टक्के पालकांना शाळा नकोच!*

 *⭕यंदाच्या शैक्षणिक वर्षात ३४ टक्के पालकांना शाळा नकोच!*                                  

 -----------------------------------     


 मुंबई : यंदाच्या शैक्षणिक वर्षात म्हणजे मार्च / एप्रिलपर्यंत सरकारने शाळा उघडू नयेत, असे मत देशातील ३४% पालकांनी मांडले. तर ३२% पालकांनी ३१ डिसेंबर, २०२० पर्यंत शाळा न उघडण्याचा निर्णय घ्यावा, अशी प्रतिक्रिया दिली. ७% पालकांनी १ आॅक्टोबर, १२% पालकांनी १ नोव्हेंबर, तर ९% जणांनी १ डिसेंबरपासून शाळा उघडाव्यात, असे मत नोंदवले.  ‘लोकल सर्कल’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातील हे निरीक्षण आहे. सप्टेंबरमध्ये शाळा सुरू करण्यासंदर्भात याआधीही संस्थेने सर्वेक्षण केले होते. त्या वेळी २३% पालकांनी शाळा सुरू करण्यास पाठिंबा दिला होता. मात्र गेल्या काही दिवसांत वाढलेल्या कोरोना संसर्गामुळे या आकडेवारीत ३% घट दिसून आली. काही राज्यांत अटी-शर्तींचे पालन करून शाळा सुरू करण्याच्या सूचना आहेत. मात्र देशातील कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता पालकांच्या मनात धास्ती तसेच मुलांच्या सुरक्षेबाबत काळजी आहे. या सर्वेक्षणासाठी देशातील २१७ जिल्ह्यांतील १४ हजार ५०० पालकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या. सरकार शाळा सुरू करण्यासंदर्भात पालकांच्या मतांच्या, प्रतिक्रियांचा विचार करून योग्य तो निर्णय घेऊ शकेल यासाठी हा अहवाल राज्य आणि केंद्र सरकारला सादर केला जाणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या