MB NEWS:पीकाच्या नुकसानीचे भरपाई द्या अन्यथा तीव्र करू-साईराजे देशमुख
पीकाच्या नुकसानीचे भरपाई द्या अन्यथा तीव्र करू-साईराजे देशमुख
परळी(प्रतिनिधी):-ऑक्टोबरध्ये झालेला अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून पंचनाम्याच्या फेऱ्यात न अडकविता शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी ५०,०००रूपय मदत करावी अन्यथा अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष मा.नानासाहेब जावळे पाटील , याचा नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा अ.भा.छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष साईराजे देशमुख यांनी दिला.
तालुकाध्यक्ष साईराजे देशमुख यांनी दिलेल्या पत्राद्वारे म्हटले होते की चालू खरीप हंगामाध्ये चांगला पाऊस झाल्यानंतर कापूस,तुर,सोयाबीन, बाजरी,आदी पीके चांगली आली होती. परंतु ऑक्टोबर चा परतीच्या पावसामुळे होत्याचे नव्हते झाले हाता तोंडाशी आलेला घास अतिवृष्टीमुळे हिरावून घेतला गेला.कापसाच्या वाती झाल्या.सोयाबीन कोम फुटले, काढून ठेवलेल्या बाजरीचे भिजल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.अशा परिस्थिती मध्ये सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे.मंत्र्यांनी मंत्रालयात बसून चौकशी करण्यापेक्षा शेतकऱ्यांचा बादावर जाऊन त्यांचे हाल विचारावेत आणि तात्काळ शेतकऱ्यांना हेक्टरी ५०,०००हजार रूपये मदत देण्यात यावी अन्यथा अखिल भारतीय छावा संघटना तीव्र प्रकारे आदोलन करूल
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा