परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS:पीकाच्या नुकसानीची भरपाई द्या अन्यथा तीव्र आंदोलन करू-जिल्हाध्यक्ष निळंकठ चाटे

 पीकाच्या नुकसानीची भरपाई द्या अन्यथा तीव्र आंदोलन करू-जिल्हाध्यक्ष निळंकठ चाटे




बीड (प्रतिनिधी) :- ऑक्टोंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पंचनाम्याच्या फेऱ्यात न अडकविता शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी अन्यथा माजी मंत्री पंकजाताई मुंडे आणि खा.प्रीतमताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे यांनी दिला आहे.

       जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, चालु खरीप हंगामामध्ये चांगला पाऊस झाल्यानंतर कापूस, तुर, सोयाबीन, बाजरी आदी पीके चांगली आली होती. परंतु ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसाने होत्याचे नव्हते झाले. हाता तोंडाशी आलेला घास अतिवृष्टीमुळे हिरावून घेतला गेला. कापसाच्या वाती झाल्या. सोयाबीन कोम फुटले, काढून ठेवलेल्या बाजरीचे भिजल्यामुळे नुकसान झाले. अशा परिस्थितीमध्ये सरकारने आता शेतकऱ्यांना तात्काळ मदत करणे गरजेचे आहे. मंत्र्यांनी मंत्रालयात बसून चौकशी करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या बांधावर जावून त्यांचे हाल पहावेत अशी मागणी करतानाच तात्काळ मदत भेटली नाही तर माजी मंत्री पंकजाताई मुंडे आणि खा.प्रीतमताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे यांनी दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!