इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS:लॉकडाऊनमुळे खर्डे बंधूंनी व्यवसाय बदलला;पुजा साहित्याऐवजी रेडिमेड कपड्यांची विक्री

 लॉकडाऊनमुळे खर्डे बंधूंनी व्यवसाय बदलला;पुजा साहित्याऐवजी रेडिमेड कपड्यांची विक्री



*परळी (प्रतिनिधी)*

लॉकडाऊन संपले असले तरी अद्याप बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले वैद्यनाथ मंदिर दर्शनासाठी उघडले नसल्याने मंदिर परिसरातील पुजा साहित्य विक्री करणारे दुकाने बंदच आहेत. या पार्श्वभूमीवर पुजा साहित्य विक्री ऐवजी खर्डे बंधूंनी मोंढा परिसरात व्यवसायात बदल करून रेडिमेड गारमेंटसची विक्री व्यवसाय सुरू केला आहे.

परळी शहरातील वैद्यनाथ मंदिर परिसरात माणिकनगर भागातील रहिवाशी ज्ञानेश्वर खर्डे व रामभाऊ खर्डे यांचे पुजा साहित्य विक्रीचे दुकान मागील अनेक वर्षापासून कार्यरत आहे. लॉकडाऊनमुळे मागील काही महिन्यांपासून मंदिर बंद असून त्यामुळे पुजा साहित्य विक्री सुद्धा बंदच आहे. लॉकडाऊन उघडले असले तरी वैद्यनाथ मंदिर बंद असल्याने पुजा साहित्याची विक्री होत नाही. या पार्श्वभूमीवर खर्डे बंधूंनी मोंढा मार्केटमध्ये तयार कपड्यांच्या विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. परळी शहरात अनेकांना यामुळे रोजगार गमावण्यासोबतच व्यवसायाचे संकट झेलावे लागले. खर्डे बंधूंनी झालेला बदल लक्षात घेवून व्यवसायात व जागेतही बदल केला आहे. आम्हाला व्यवसाय जीवनावश्यक असून आम्ही हा बदल गरज म्हणून स्वीकारल्याचे खर्डे बंधूंनी सांगितले. व्यवसाय बदलला तरच आपले जीवनमान पूर्णपणे कार्यक्षमता व जीवनावश्यक होवू शकेल यामुळेच तयार कपड्यांचा व्यवसाय आम्ही सुरू केला असल्याचे ते म्हणाले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या