प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS-राज्यपाल कोट्यातून बारा जणांची विधान परिषदेवर नियुक्ती करताना राज्यपालांनी घटनेच्या अनुच्छेद 171 (5)मधील तरतुदींचे पालन करावे* *एस.एम.देशमुख यांची मागणी*

 *राज्यपाल कोट्यातून बारा जणांची विधान परिषदेवर नियुक्ती करताना राज्यपालांनी घटनेच्या अनुच्छेद 171 (5)मधील तरतुदींचे पालन करावे*

*एस.एम.देशमुख यांची मागणी* 



मुंबई : राज्यपाल नियुक्त बारा जागांसाठी कॅबिनेटने ज्या नावांची शिफारस केली आहे त्यातील बहुतेक नावं राजकीय व्यक्तींची आहेत, हा सरळ सरळ घटनेतील अनुच्छेद 171 (5)च्या तरतुदींचा भंग असल्याने राज्यपाल महोदयांनी ही नावं स्वीकारू नयेत अशी विनंती मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी राज्यपालांना पाठविलेल्या पत्रात केली आहे..

यासंबंधी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आपली भूमिका विस्तारानं मांडताना देशमुख म्हणतात, 

भारतीय घटनेच्या अनुच्छेद 171 (5) नुसार विधान परिषदेवर 12 सदस्यांची नियुक्ती करण्याचा राज्यपालांना अधिकार आहे .. मात्र राज्यपाल हे केवळ स्वाक्षरीचे धनी आहेत.. सत्ताधारी पक्षानं किंवा पक्षांनी बारा नावं सुचवायची, त्याला राज्य मंत्रिमंडळानं संमती द्यायची आणि मग ती यादी राज्यपालांकडे पाठवायची अशी ही प्रक्रिया आहे.. या यादीमध्ये राज्यपाल स्वतःच्या मर्जीने एकही नाव घालू शकत नाहीत..

मात्र घटनाकारांनी जी 12 जागांची व्यवस्था केली आहे त्यामागचा उद्देश लक्षात घेतला पाहिजे.. निवडणूक प्रक्रियेतून जी मंडळी परिषदेवर निवडून येऊ शकत नाही पण ज्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा समाजहितासाठी उपयोग होणे गरजेचे असते अशा विविध क्षेत्रातील मंडळींची वर्णी परिषदेवर लागली पाहिजे अशी घटनाकारांनी अपेक्षा होती.. त्यासाठी ही तरतूद.. ही तरतूद करतांना घटनाकारांनी राज्यपाल नियुक्त व्यक्ती कोणत्या क्षेत्रातल्या असाव्यात याचंही मार्गदर्शन केलेलं आहे.. कला, साहित्य, विज्ञान, सहकार आणि सामाजिक कार्य या

या क्षेत्रातील व्यक्तींना राज्यपालांनी परिषदेवर घ्यावं असं घटनेत स्पष्टपणे नमुद करण्यात आले आहे.. मात्र विधान परिषद अस्तित्वात आल्यापासून घटनेतील या तरतुदीची सातत्यानं पायमल्ली होत आली आहे..काही अपवाद वगळता बहुतेक वेळा राजकीय बगलबच्चयांचीच राज्यपाल कोट्यातून परिषदेवर सोय केली गेलेली आहे.. या वेळी देखील हेच घडत आहे.. कॅबिनेटनं आज जी बारा नावं राज्यपालांकडे पाठविली आहेत त्यात अपवाद वगळता बहुतेक जण राजकीय आहेत.. हा सरळ सरळ घटनेतील य अनुच्छेद 171 (5) मधील तरतुदींचा भंग आहे.. त्यामुळे राज्यपाल महोदयांना आमची विनंती आहे की, त्यांनी ही नावं स्वीकारू नयेत.. मराठी पत्रकार परिषदेच्या शिष्टमंडळाने जेव्हा राज्यपाल मा. भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती तेव्हा त्यांनी "सर्व प्रक्रिया घटनेतील तरतुदीनुसार पार पडेल" असा शब्द दिला होता.. त्यानुसार राज्यपालांनी कारवाई करावी अशी विनंती देशमुख यांनी केली आहे.. दिलेली नावं तरतुदीनुसार नसतील तर ती फेरविचारासाठी पाठविण्याचा अथवा विषय प्रलंबित ठेवण्याचा अधिकार राज्यपालांना आहे.. चुकीचा पायंडा बंद करून घटनाकारांची अपेक्षा पूर्ण करण्याचा निर्णय राज्यपालांनी घ्यावा अशी अपेक्षा ही एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केली आहे..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या