प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS: *किसान सभेच्या आंदोलनास यश;ट्रान्सफार्मर बसविण्याचे लेखी आश्वासन*

 *किसान सभेच्या आंदोलनास यश;ट्रान्सफार्मर बसविण्याचे लेखी आश्वासन*



परळी वै. प्रतिनिधी

दररोज चार याप्रमाणे वाण धरणावरील सर्व ट्रान्सफार्मर येत्या आठ दिवसात बसविण्याच्या लेखी आश्वासनाने किसान सभेच्सा बेमुत ठिय्या आंदोलनाला यश मिळाले आहे.

वाण धरणातील पाणी शेतकर्यांना मिळावे, प्रशासनाने उतरुण नेलेले विजेचे ट्रान्सफार्मर तात्काळ बसउन द्यावे, 2015 पासुन बंद असलेल्या मोटारीचे वीज बिल माफ करावे व जायकवाडीचे पाणी लिफ्टद्वारे वाण धरणात सोडावे या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने सोमवारी दि.९ रोजी नागापुर येथील वाण धरणावर सकाळी दहा वाजल्या पासुन ठिय्या आंदोलनास सुरुवात करण्यात आले होते. दुपारी एक वाजता विज वितरण चे परळी येथील अतिरीक्त कार्यकारी अभियंत्यानी धरणावर जाउन आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी विज वितरण च्या अधिकार्यांनी येत्या आठ दिवसात धरण परिसरातील उतरूण नेलेले ट्रान्सफार्मर बसउन देण्याचे लेखी आश्वासन दिले. आंदोलनाचे नेतृत्व किसान सभेचे जिल्हा सचिव कॉ. मुरलीधर नागरगोजे यांनी केले. यामुळे धरण परिसरातील शेतकर्यांना शेतीसाठी वाण धरणातील पाण्याचा उपयोग करता येणार आहे. या आंदोलनात काॅ प्रभाकर नागरगोजे, भिमराव मुंडे, काॅ अशोक नागरगोजे, रावण नागरगोजे, काशीनाथ मुंडे, गंगाधर नागरगोजे, वसंत नागरगोजे, पानु डिघोळे, अगदी पाळवदे, गणेश सिद्राम नागरगोजे, गेना नागरगोजे, उत्तम मुंडे, बालासाहेब नागरगोजे, गणेश आत्माराम नागरगोजे, जगन्नाथ खलसे यांच्यासह धरण परिसरातील शेतकरी मोठया संख्येनी सहभागी झाले होते.



*धरणावर पहिल्यांदाच झाले आंदोलन*

वाण धरणाच्या पाण्यासाठी वाण धरणावर आंदोलन झाल्याने परिसरात आंदोलात शेतकरी सहभागी झाले होते. आत्ता पर्यंत प्रशासकिय कार्यालया समोर आंदोलन होत असे. किसान सभेनी मात्र प्रश्नाच्या ठिकाणी आंदोलन करुण प्रश्नाची सोडवणुक करुण घेतली आसल्याने शेतकर्यांमधुन समाधान व्यक्त होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या