युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS:बीड जिल्ह्यात रब्बी पिकासाठी पाण्याचे जलसंपदा विभागाने नियोजन करावे - वसंत मुंडे

 बीड जिल्ह्यात रब्बी पिकासाठी पाण्याचे जलसंपदा विभागाने नियोजन करावे -  वसंत मुंडे



 परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... 

 यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकरी रब्बी पिकासाठी उत्साहित आहे. कारण खरीप अतिवृष्टीमुळे हातचे आलेले पीक डोळ्यादेखत नुकसान झाली तरीही शेतकरी रब्बी पेरणीसाठी ज्वारी गहू भुईमूग हरभरा कर्डी जवस व इतर पिके घेण्यासाठी तयारीला लागला. बारामाही पिकासाठी ऊस लागवड सह इतर फळबाग पिकाचे तयारी शेतकरी करीत आहे, असे काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी माहिती दिली. परंतु जलसंपदा, पाटबंधारे विभागाने सर्व मुख्य कॅनल चाऱ्या गेट दुरुस्त करणे काळाची गरज आहे. त्यामुळे शेतक-याला व्यवस्थित पाणी त्याच्या शेतीमध्ये पिकला देता येईल. महाराष्ट्र शासनाकडे पाटबंधारे विभागा संदर्भातील व्यवस्थित शेतकऱ्यांना पाणी बांधापर्यंत पोहोचण करिता शासना मार्फत नियोजन करून शेतकऱ्यांच्या पिकाला पाणी उपलब्ध करून देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्याकडे मागणी काँग्रेसचे नेते वसंत मुंडे चेअरमन श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार नाशिक विभाग यांनी निवेदनाद्वारे शासनाला विनंती केली. परळी तालुका अंतर्गत वाण धरण कासारवाडी चांदापूर अंबलवाडी धर्मापुरी कनेरवाडी मालेवाडी तर छोटे-मोठे धरण आहेत परंतु अनेक वीटभट्ट्या उद्योग करणाऱ्या लोकांनी शासकीय जागेवर अतिक्रमण करून कॅनॉल उकडून टाकले आहेत त्यामुळे शेवटच्या शेतकऱ्याला पाणी पोहोचणे अवघड आहे या सर्व बाबी जलसंपदा, पाटबंधारे विभागाने तपासून व दुरुस्ती करून शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे.त्वरित शासन स्तरावर आदेश देण्याची मागणी काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे रब्बी पिकाचे नियोजन केल्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात शेती मधून उत्पन्न मिळेल कारण वातावरण योग्य असल्यामुळे पिके चांगली येण्याची शेतकऱ्यांना शक्यता वाटते करिता शासनाने खत बी बियाणे औषधी तेलंगणा राज्याच्या पॅटर्नप्रमाणे शेतकऱ्याला उपलब्ध करून दिल्यास अथवा बी बियाणे खते औषधे खरेदी करण्यासाठी पैसे लागतात. बँकेच्या खात्यात वर्ग केल्यास शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या आर्थिक मदत होईल करिता महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री, कृषीमंत्री, जलसंपदा मंत्री संबंधित प्रधान सचिव यांना निवेदनाद्वारे पाटबंधारे,जलसंपदा संदर्भात व कृषी खात्यामार्फत खते बी-बियाणे औषध उपलब्ध करून देण्यासंदर्भात निवेदनाद्वारे विनंती केली असल्याची माहिती काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या