इमेज
  दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी दिपक गोविंद गित्ते  इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो येथे सिलेक्शन  परळी ( प्रतिनिधी) दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी चिरंजीव दीपक गोविंदराव गित्ते यांची मध्यप्रदेश भोपाल येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो या खेळामध्ये सिलेक्शन झाल्याबद्दल शाळेचे प्रेरणास्थान मार्गदर्शक मा. श्री .किरण गित्ते साहेब IAS सचिव : सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, उद्योग व वाणिज्य विभाग त्रिपुरा सरकार,  विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्षा : सौ.उषाताई किरण गित्ते , शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. श्रीकांत पाटील सर यांनी गोविंद गित्ते कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .  या स्पर्धा मध्य प्रदेश भोपाल येथे इंटरनॅशनल या स्पर्धा दिनांक 12 मे 2026 रोजी होणार आहेत.           मराठवाड्यातील  नामांकित दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलने आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना खेळामध्ये महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झाले असून आता दीपक गोविंदराव गित्ते या विद्यार्थ्य...

MB NEWS:बीड जिल्ह्यात रब्बी पिकासाठी पाण्याचे जलसंपदा विभागाने नियोजन करावे - वसंत मुंडे

 बीड जिल्ह्यात रब्बी पिकासाठी पाण्याचे जलसंपदा विभागाने नियोजन करावे -  वसंत मुंडे



 परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... 

 यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकरी रब्बी पिकासाठी उत्साहित आहे. कारण खरीप अतिवृष्टीमुळे हातचे आलेले पीक डोळ्यादेखत नुकसान झाली तरीही शेतकरी रब्बी पेरणीसाठी ज्वारी गहू भुईमूग हरभरा कर्डी जवस व इतर पिके घेण्यासाठी तयारीला लागला. बारामाही पिकासाठी ऊस लागवड सह इतर फळबाग पिकाचे तयारी शेतकरी करीत आहे, असे काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी माहिती दिली. परंतु जलसंपदा, पाटबंधारे विभागाने सर्व मुख्य कॅनल चाऱ्या गेट दुरुस्त करणे काळाची गरज आहे. त्यामुळे शेतक-याला व्यवस्थित पाणी त्याच्या शेतीमध्ये पिकला देता येईल. महाराष्ट्र शासनाकडे पाटबंधारे विभागा संदर्भातील व्यवस्थित शेतकऱ्यांना पाणी बांधापर्यंत पोहोचण करिता शासना मार्फत नियोजन करून शेतकऱ्यांच्या पिकाला पाणी उपलब्ध करून देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्याकडे मागणी काँग्रेसचे नेते वसंत मुंडे चेअरमन श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार नाशिक विभाग यांनी निवेदनाद्वारे शासनाला विनंती केली. परळी तालुका अंतर्गत वाण धरण कासारवाडी चांदापूर अंबलवाडी धर्मापुरी कनेरवाडी मालेवाडी तर छोटे-मोठे धरण आहेत परंतु अनेक वीटभट्ट्या उद्योग करणाऱ्या लोकांनी शासकीय जागेवर अतिक्रमण करून कॅनॉल उकडून टाकले आहेत त्यामुळे शेवटच्या शेतकऱ्याला पाणी पोहोचणे अवघड आहे या सर्व बाबी जलसंपदा, पाटबंधारे विभागाने तपासून व दुरुस्ती करून शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे.त्वरित शासन स्तरावर आदेश देण्याची मागणी काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे रब्बी पिकाचे नियोजन केल्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात शेती मधून उत्पन्न मिळेल कारण वातावरण योग्य असल्यामुळे पिके चांगली येण्याची शेतकऱ्यांना शक्यता वाटते करिता शासनाने खत बी बियाणे औषधी तेलंगणा राज्याच्या पॅटर्नप्रमाणे शेतकऱ्याला उपलब्ध करून दिल्यास अथवा बी बियाणे खते औषधे खरेदी करण्यासाठी पैसे लागतात. बँकेच्या खात्यात वर्ग केल्यास शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या आर्थिक मदत होईल करिता महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री, कृषीमंत्री, जलसंपदा मंत्री संबंधित प्रधान सचिव यांना निवेदनाद्वारे पाटबंधारे,जलसंपदा संदर्भात व कृषी खात्यामार्फत खते बी-बियाणे औषध उपलब्ध करून देण्यासंदर्भात निवेदनाद्वारे विनंती केली असल्याची माहिती काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....