इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS: *बीडची घटना दुर्दैवी ; स्पेशल टास्क फोर्स नेमून चौकशी करा - पंकजाताई मुंडे यांची मागणी* *_मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी तात्काळ लक्ष घालून आरोपींवर कडक कारवाई करावी_*

 *बीडची घटना दुर्दैवी ; स्पेशल टास्क फोर्स नेमून चौकशी करा - पंकजाताई मुंडे यांची मागणी*

*_मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी तात्काळ लक्ष घालून आरोपींवर कडक कारवाई करावी_*



मुंबई दि. १५ ------ बीड जिल्हयातील येळंबघाट येथे तरूणीला जिवंत जाळण्यात आल्याची घटना अतिशय दुर्दैवी व माणूसकीला काळीमा फासणारी आहे. मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी यात तातडीने लक्ष घालावे आणि स्पेशल टास्क फोर्स नियुक्त करून घटनेची सखोल चौकशी करावी अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना केली. 


   नांदेड जिल्हयातील एका तरूणीला येळंबघाट परिसरात ॲसिड व पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याचा प्रकार काल पहाटे घडला. हा प्रकार अतिशय दुर्दैवी आहे, एखाद्याला जिवंत जाळणं हेच मुळात वेदनादायी आहे. महाराष्ट्रात अशा घटना वारंवार घडताहेत याच दुःख वाटतयं. या घटनेचा मी निषेध करते. ऐन दिवाळीत घडलेल्या या घटनेने मन सुन्न झाले. मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी यात लक्ष घालून तात्काळ घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करावी तसेच स्पेशल टास्क फोर्स नेमून याची चौकशी करावी. यासंदर्भात मी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांना आजच पत्र लिहित आहे. आरोपींविरुद्ध कडक कारवाई झाली पाहिजे तसेच राज्यातील महिलांच्या सुरक्षेबाबत ठोस पावलं उचलली गेली पाहिजेत अशी मागणी पंकजाताई मुंडे यांनी केली आहे.

••••

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!