इमेज
  दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी दिपक गोविंद गित्ते  इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो येथे सिलेक्शन  परळी ( प्रतिनिधी) दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी चिरंजीव दीपक गोविंदराव गित्ते यांची मध्यप्रदेश भोपाल येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो या खेळामध्ये सिलेक्शन झाल्याबद्दल शाळेचे प्रेरणास्थान मार्गदर्शक मा. श्री .किरण गित्ते साहेब IAS सचिव : सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, उद्योग व वाणिज्य विभाग त्रिपुरा सरकार,  विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्षा : सौ.उषाताई किरण गित्ते , शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. श्रीकांत पाटील सर यांनी गोविंद गित्ते कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .  या स्पर्धा मध्य प्रदेश भोपाल येथे इंटरनॅशनल या स्पर्धा दिनांक 12 मे 2026 रोजी होणार आहेत.           मराठवाड्यातील  नामांकित दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलने आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना खेळामध्ये महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झाले असून आता दीपक गोविंदराव गित्ते या विद्यार्थ्य...

MB NEWS: *बीडची घटना दुर्दैवी ; स्पेशल टास्क फोर्स नेमून चौकशी करा - पंकजाताई मुंडे यांची मागणी* *_मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी तात्काळ लक्ष घालून आरोपींवर कडक कारवाई करावी_*

 *बीडची घटना दुर्दैवी ; स्पेशल टास्क फोर्स नेमून चौकशी करा - पंकजाताई मुंडे यांची मागणी*

*_मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी तात्काळ लक्ष घालून आरोपींवर कडक कारवाई करावी_*



मुंबई दि. १५ ------ बीड जिल्हयातील येळंबघाट येथे तरूणीला जिवंत जाळण्यात आल्याची घटना अतिशय दुर्दैवी व माणूसकीला काळीमा फासणारी आहे. मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी यात तातडीने लक्ष घालावे आणि स्पेशल टास्क फोर्स नियुक्त करून घटनेची सखोल चौकशी करावी अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना केली. 


   नांदेड जिल्हयातील एका तरूणीला येळंबघाट परिसरात ॲसिड व पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याचा प्रकार काल पहाटे घडला. हा प्रकार अतिशय दुर्दैवी आहे, एखाद्याला जिवंत जाळणं हेच मुळात वेदनादायी आहे. महाराष्ट्रात अशा घटना वारंवार घडताहेत याच दुःख वाटतयं. या घटनेचा मी निषेध करते. ऐन दिवाळीत घडलेल्या या घटनेने मन सुन्न झाले. मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी यात लक्ष घालून तात्काळ घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करावी तसेच स्पेशल टास्क फोर्स नेमून याची चौकशी करावी. यासंदर्भात मी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांना आजच पत्र लिहित आहे. आरोपींविरुद्ध कडक कारवाई झाली पाहिजे तसेच राज्यातील महिलांच्या सुरक्षेबाबत ठोस पावलं उचलली गेली पाहिजेत अशी मागणी पंकजाताई मुंडे यांनी केली आहे.

••••

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....