इमेज
  दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी दिपक गोविंद गित्ते  इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो येथे सिलेक्शन  परळी ( प्रतिनिधी) दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी चिरंजीव दीपक गोविंदराव गित्ते यांची मध्यप्रदेश भोपाल येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो या खेळामध्ये सिलेक्शन झाल्याबद्दल शाळेचे प्रेरणास्थान मार्गदर्शक मा. श्री .किरण गित्ते साहेब IAS सचिव : सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, उद्योग व वाणिज्य विभाग त्रिपुरा सरकार,  विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्षा : सौ.उषाताई किरण गित्ते , शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. श्रीकांत पाटील सर यांनी गोविंद गित्ते कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .  या स्पर्धा मध्य प्रदेश भोपाल येथे इंटरनॅशनल या स्पर्धा दिनांक 12 मे 2026 रोजी होणार आहेत.           मराठवाड्यातील  नामांकित दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलने आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना खेळामध्ये महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झाले असून आता दीपक गोविंदराव गित्ते या विद्यार्थ्य...

MB NEWS:परळी तालुका कामगार, कर्मचारी, शेतकरी, शेतमजूर संयुक्त कृती समितीच्या वतीने २६ नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयासमोर निदर्शने - प्रा.बी.जी खाडे.

 परळी तालुका कामगार, कर्मचारी, शेतकरी, शेतमजूर संयुक्त कृती समितीच्या वतीने २६ नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयासमोर निदर्शने - प्रा.बी.जी खाडे



परळी वै. (प्रतिनिधी) ः परळी तालुक्यातील कामगार, कर्मचारी, शेतकरी, शेतमजूर कृती समितीची दिनांक १७ नोव्हेंबर रोजी सीटू कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत २६ नोव्हेंबर रोजी देशव्यापी संपाच्या निमित्ताने तहसील कार्यालयापुढे दुपारी १ वाजता निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती संयुक्त कृतीसमितीचे निमंत्रक प्रा.बी.जी.खाडे यांनी दिली.

देशातील सर्व केंद्रीय कामगार संघटनांनी व कामगार संघटांच्या महासंघाने दि.२६ नोव्हेंबर २०२० रोजी देशव्यापी सार्वत्रिक संप करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने पुर्वीचे कामगार कायदे रद्द केले आहेत व कामगारांचेे हक्क हिरावून घेतले आहेत. नविन कामगार कायद्याला कामगार संघटनांचा विरोध आहे. केंद्र सरकारने केलेल्या नविन कृषी कायदा शेतकरी विरोधी असून या कायद्याला देशातील सर्व शेतकर्‍यांचा विरोध आहे. केंद्र सरकारने कामगार संहितेची निर्मिती फक्त उद्योगपतीच्या फायद्यासाठीच केलेली आहे. त्यात कामगारांच्या हिताचा कोठेही विचार केलेला नाही. कोरोना महामारीच्या काळात अनेक कामगारांचे काम गेले आहे. परंतू सरकारने त्यांना काहीही मदत केलेली नाही. कामगारांच्या, शेतकर्‍यांच्या व कर्मचार्‍यांच्या प्रश्नावर बैठकीत चर्चा होवून उत्पन्न कर (इन्कम टॅक्स) लागू नसणार्‍या कुटूंबास प्रत्येक महिना ७५००/- रूपये द्या, प्रत्येक गरजू कुटूंबाला मानसी १० किलो धान्य द्या, मनरेगाचे काम प्रत्येकास २०० दिवस द्या व मजूरी ५०० रूपये द्या, सार्वजनिक उद्योेगाचे खाजगीकरण थांबवा, नविन पेन्शन योजना रद्द करा व जुनीच पेन्शन योजना लागू करा, कंत्राटीकरण थांबवा व कायमस्वरूपी नियुुक्त्या द्या इत्यादी मागण्यांसाठी दि.२६ नोव्हेंबर २०२० रोजी दुपारी १ वाजता निदर्शने करण्यात येणार आहेत.  

संयुक्त कृती समितीच्या बैठकीस कृती समितीचे निमंत्रक प्रा.खाडे बी.जी., किरण सावजी, मुरलीधर नागरगोजे, अशिष अवचारे, शरणम ताटे, राजाभाऊ जगतकर, सुरेश वाल्मीकी, ज्ञानेश्वर गुंडाळे, शिवरत्न आघाव, हंसराज गंडले, अनिता गिराम, छाया रणदिवे, महादेव हजारे, संजय जाधव, सुधाकर तेलगे, अश्विनी खेत्रे इत्यादी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट