इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:कामगार कल्याण मंडळ कर्मचारी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस अनंत जगताप यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन

 कामगार कल्याण मंडळ  कर्मचारी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस अनंत जगताप यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन




प्रतिनिधी : (औरंगाबाद) 

 महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कर्मचारी संघटना संलग्न भारतीय कामगार कर्मचारी महासंघ या संघटनेचे प्रदेश सरचिटणीस अनंत जगताप यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन  करण्यात आले आहे.


महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कर्मचारी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस  अनंत जगताप हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहे. या निमित्ताने शुक्रवार २७ नोव्हेंबर २०२०  रोजी दुपारी २ वाजता  मुंबई येथील कामगार कल्याण मंडळाच्या हुतात्मा बाबू गेनू गिरणी कामगार क्रीडा भवन सेनापती बापट मार्ग येथे कृतज्ञता सोहळा  संपन्न होणार आहे. 


 या कृतज्ञता सोहळ्याला भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष आमदार भाई जगताप, कामगार कल्याण मंडळ कर्मचारी संघटनेचे मानद सदस्य दिलीप दादा जगताप, कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज ईळवे यांची उपस्थिती राहणार आहे.


  अनंत जगताप यांनी पूर्णवेळ व अर्धवेळ कर्मचाऱ्यांच्या हिताचे अनेक कामे केली. २००५ मधील कर्मचारी भरती संबंधी शासन व प्रशासनासह न्यायालयीन लढा देऊन अनेक कर्मचाऱ्यांचे संसार उध्वस्त  होण्यापासून वाचविले. कर्मचाऱ्यांना मंडळाच्या हितासाठी कार्य करण्यासाठी प्रोत्साहन दिले. 


कामगार कल्याण मंडळातील अर्धवेळ कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न ज्यामध्ये १० वर्ष पेक्षा अधिक सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ तसेच अर्धवेळ कर्मचाऱ्यांचे वेतनात महागाई निर्देशांक नुसार वाढ करणे, अर्धवेळ कर्मचारी यांना पूर्णवेळ करणे आदी प्रश्नावर संघटनेच्या वतीने  सरचिटणीस अनंत जगताप यांनी  लढा दिला आहे.


कामगार कल्याण मंडळाचे कर्मचारी यांना ७ वे वेतन आयोग लागू करण्यासाठी अनंत जगताप हे संघटनेच्या माध्यमातून सतत प्रशासनासोबत संघर्ष करीत  राहिले.

 

कर्मचाऱ्यांच्या हिताचे कार्य केल्याने  त्यांचा चाहतावर्ग संपूर्ण राज्यभर आहे. या कृतज्ञता सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन , फेरोज खान,  विजय अहिरे , अफरोज अहमद,  वासे अहमद, स्वप्नील मोरे,  जी. एन. जाधव, नजरोद्दीन शेख, एस.व्ही. अवचार, नागेश कल्याणकर, संगमेश्वर जिरगे, डी.डी. रेणुके, संतोष जाधव यांनी केले आहे.

टिप्पण्या

  1. Sir ahet mhanun mandalatil karmchari Anand ahat matr tumachi univ hi asanar aahe saheb we will miss you shri jagtap sir

    उत्तर द्याहटवा
  2. श्री अनंत जगताप सर मुळेच आम्ही 2005 च्या भरती मधील लोक आज कामावर आहोत, त्यांच्यामुळे च आज आमचे सर्व कामे झालेली आहेत,,

    त्याच्या भावी आयुष्याच्या हार्दीक शुभेच्छा, त्यांना आरोग्यपूर्ण उदंड आयुष्य लाभो हीच सदिच्छा ।

    नदीम शेख, बांधकाम शाखा, मधवर्ती कार्यालय, मुंबई

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!