मोठ्या संख्येने उपस्थित रहा....

इमेज
द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आज आयोजन परळी वैजनाथ | प्रतिनिधी द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालय, परळी वैजनाथ यांच्या वतीने २० वे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे स्नेहसंमेलन आज  बुधवार, दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे  नटराज रंग मंदिर, परळी वैजनाथ येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामलिंग राजनळे सर (माजी मुख्याध्यापक, वैद्यनाथ विद्यालय) राहणार असून उद्घाटन  गणेश गिरी (गटशिक्षणाधिकारी, गटसाधन केंद्र, परळी वै.) यांच्या हस्ते होणार आहे. या काकार्यक्रमास बाजीराव  भैय्या   धर्माधिकारी (माजी नगराध्यक्ष),  कोकणे  (विस्ताराधिकारी),  धनंजय ढोणे  (पोलीस निरीक्षक),  दिवाकर जोशी (गझलकार), प्रा. रविंद्र जोशी सर (पत्रकार,  दैनिक पुढारी),  व्यंकटेश शिंदे (नगरसेवक) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.           स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचे नृत...

MB NEWS:*राज्यभरात थंडीची लाट; नागरिकांना हुडहुडी*

 ⭕⭕⭕

*राज्यभरात थंडीची लाट; नागरिकांना हुडहुडी*



मुंबई – राज्यात आता गुलाबी थंडीची लाट यायला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने  तापमानात घट होईल, अशी शक्यता वर्तविली होती. त्यानुसार  मुंबईत हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई आणि उपनगरांमध्ये 19.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली. तर आज बुधवारी मुंबईत 19.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

भारतीय हवामान खात्याच्या पश्चिम विभागाचे उपमहासंचालक के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळपासूनच ईशान्य दिशेने वेगाने थंड वारे वाहतील. यामुळे रात्रीच्या तापमानात घट होईल तर गुरुवारपासून वाऱ्याची दिशा पुन्हा बदलण्याची शक्यता असल्याची माहिती देण्यात आली होती.

दरम्यान, आज राज्यात सर्वात कमी नोंद परभणीमध्ये झाली आहे. परभणी विद्यापीठ इथे किमान तापमान 8.0 अंश डिग्री सेल्सिअस इतके नोंदविले गेले आहे. तर यवतमाळमध्ये 10.0 अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तसेच नाशिकचे तापमान 11.8 पर्यंत घसरल्याने नाशिककरांना हुडहुडी भरली आहे. त्याचबरोबर देशाच्या उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे निफाड तालुका चांगला गारठला आहे. त्यामुळे उब मिळवविण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात आहेत. महत्त्वाचे म्हणजे राज्यात ठिकठिकाणी धुक्याची चादर पसरली आहे. परिणामी गारव्यामुळे नागरिकांचे मन प्रफुल्लित आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....