इमेज
  गर्भवती महिला हेळसांड: उपचारातील हलगर्जी प्रकरणी गित्ते हाॅस्पिटल मधील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्याची मागणी परळी वैजनाथ, प्रतिनिधी:        शहरातील गित्ते हाॅस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आता पुरावे सुरक्षित ठेवण्याची मागणी पुढे आली आहे. तक्रारदाराने शहर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन संबंधित रुग्णालय तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर तात्काळ जप्त करून सुरक्षित ताब्यात घेण्याची मागणी केली आहे.          तक्रारदार वैजनाथ संभाजी मुंडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या पत्नीवर उपचार करताना डाॅ.कल्पना सचिन गित्ते यांच्याविरुद्ध हलगर्जीपणा झाल्याचा आरोप यापूर्वीच लेखी तक्रार करुन करण्यात आला आहे. या प्रकरणात सत्य समोर येण्यासाठी रुग्णालयातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.२३ एप्रिल ते २४ एप्रिलदरम्यान रुग्णालयातील केबिन, कॉरिडॉर तसेच बाहेरील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच रु...

MB NEWS:*राज्यभरात थंडीची लाट; नागरिकांना हुडहुडी*

 ⭕⭕⭕

*राज्यभरात थंडीची लाट; नागरिकांना हुडहुडी*



मुंबई – राज्यात आता गुलाबी थंडीची लाट यायला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने  तापमानात घट होईल, अशी शक्यता वर्तविली होती. त्यानुसार  मुंबईत हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई आणि उपनगरांमध्ये 19.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली. तर आज बुधवारी मुंबईत 19.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

भारतीय हवामान खात्याच्या पश्चिम विभागाचे उपमहासंचालक के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळपासूनच ईशान्य दिशेने वेगाने थंड वारे वाहतील. यामुळे रात्रीच्या तापमानात घट होईल तर गुरुवारपासून वाऱ्याची दिशा पुन्हा बदलण्याची शक्यता असल्याची माहिती देण्यात आली होती.

दरम्यान, आज राज्यात सर्वात कमी नोंद परभणीमध्ये झाली आहे. परभणी विद्यापीठ इथे किमान तापमान 8.0 अंश डिग्री सेल्सिअस इतके नोंदविले गेले आहे. तर यवतमाळमध्ये 10.0 अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तसेच नाशिकचे तापमान 11.8 पर्यंत घसरल्याने नाशिककरांना हुडहुडी भरली आहे. त्याचबरोबर देशाच्या उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे निफाड तालुका चांगला गारठला आहे. त्यामुळे उब मिळवविण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात आहेत. महत्त्वाचे म्हणजे राज्यात ठिकठिकाणी धुक्याची चादर पसरली आहे. परिणामी गारव्यामुळे नागरिकांचे मन प्रफुल्लित आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....