इमेज
बीड जिल्हयातुन 1599 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये निकाली बीड- आज दिनांक 9 मे 2026 रोजी बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचेउद्घाटन आनंद एल.यावलकर, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते संपन्न झाले.   सदर उदघाटन कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 व्ही.एच. पाटवदकर, जिल्हा न्यायाधीश-2 एस.आर.शिंदे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2 आर.एम नेरलीकर मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर.शिंदे व इतर न्यायिक अधिकारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डाॅ.वहाब ए.सय्यद, बीड मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस.जी.पिसुरे, उपाध्यक्ष आर.व्ही.देशमुख, सचिव सुभाष काळे तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी, विधिज्ञ सदर उदघाटन कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरूनआनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 9 मे 2026 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकूण. 1209 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. बीड...

MB NEWS: गेवराई,अतिवृष्टीची मदत देताना पक्षपातीपणा का..??-पूजा मोरे

 अतिवृष्टीची मदत देताना पक्षपातीपणा का..??-पूजा मोरे



गेवराई, प्रतिनिधी...


बीड जिल्ह्यात पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.त्यात गेवराई तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाल्याने मंत्र्यांचे पाहणी दौरे याच भागात झाले.परंतु मंत्र्यांनी पाहणी केलेले मादळमोही व तलवाडा हे महसूल मंडळ अतिवृष्टीतुन वगळण्यात आले आहे.त्यामुळे मंत्र्यांचे दौरे फक्त फोटो पुरते होते का ?असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे यांनी केला आहे.


बीड जिल्ह्यातील 118 गावातील एक लाख 16 हजार 865 शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले तर एकूण 90 हजार 730 हेक्‍टर जिरायती क्षेत्रातील पिकांचे तर बागायती क्षेत्रातील 556 हेक्‍टरवर नुकसान झाले तसेच 87 हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले जिल्ह्यात एकूण 90 हजार 3376 हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.तर सोयाबीन,बाजरी, तूर, कापूस, ऊस, मूग या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.


त्यानुसार शासनाने अतिवृष्टीचे 10,000 कोटींचे पॅकेज जाहीर केले परंतु ज्या बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील मादळमोही व तलवाडा या भागात डझनभर मंत्र्यांनी पाहणी दौरे केले त्या भागात शेतकऱ्यांच्या शेतात अगदी गुडघ्यापर्यंत पाणी होते.कापसाच्या वाती झालेल्या होत्या,मका व सोयाबीनला कोंब फुटले होते.तोच भाग अतिवृष्टीच्या निकषातुन वगळण्यात आला आहे. त्यामुळे अतिवृष्टी ची मदत देताना पक्षपातीपणा करून सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे का? आणि शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर करून प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत का? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.


तेव्हा शासनाने जाहीर केलेल्या "अतिवृष्टीग्रस्त" मंडळात बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील मादळमोही व तलवाडा या मंडळाचा समावेश करून सरसकट NDRF ची मार्फत मिळणारी 6800रु/हेक्टरी व SDRF मार्फत मिळणारी 3200रु/हेक्टरी नुकसानभरपाई तात्काळ शेतकऱ्यांना देण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे यांनी केली आहे. या दोन्ही मंडळांना अतिवृष्टी मध्ये ग्राह्य धरून तात्काळ नुकसान भरपाई न दिल्यास शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....