गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने घुले कुटुंबास पाच लाखाची मदत जाहीर

इमेज
  ना. पंकजा मुंडे यांनी मयत विलास घुलेंच्या परिवाराचे स्वीकारले पालकत्व ; दुःखात आणि न्यायाच्या लढाईतही पाठिशी बीड दि. २३ -- टाकळी- कदमवाडी (ता. केज) परिसरात झालेल्या घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्या विलास घुले यांच्या परिवाराचे पालकत्व स्वीकारत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजा मुंडे यांनी त्यांना मदतीचा हात दिला आहे. मयत घुले यांच्या पत्नीस गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने पाच लाख रूपयांची मदत आज त्यांनी जाहीर केली आहे.    विलास घुले याच्या हत्येच्या प्रकरणात झालेल्या दुर्दैवी घटनेचा तीव्र निषेध करत ना. पंकजा मुंडे यांनी पोलिस प्रशासनाला दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, पण कोवळ्या वयात काहीही संबंध नसताना त्याचा हकनाक मृत्यू झाल्यामुळे त्याचे कुटुंब उघड्यावर पडले असून त्यांचेवर अकाली संकट आले आहे. विलास यांचे बंधू रमेश यांच्याशी ना. पंकजाताईंनी संपर्क साधून आपण विलासच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले. तुमच्या दुःखात आणि न्यायाच्या लढाईत मी  परिवाराच्या पाठिशी  ठामपणे उभी असल्याचे सांगितले. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातू...

MB NEWS:कार-कँन्टरच्या अपघातात पाच ठार;गेवराई बायपासवरील घटना

 कार-कँन्टरच्या अपघातात पाच ठार;गेवराई बायपासवरील घटना 



गेवराई : प्रतिनिधी...

    कार-कँन्टरच्या भिषण अपघातात पाच जण ठार झाल्याची घटना गेवराई बायपासवर गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास धुळे-सोलापूर महामार्गावर घडली. मयतामध्ये लातुरचे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत करत घटनेचा पंचनामा केला.

   याबाबत माहिती अशी की, लातूरहून औरंगाबाद कडे निघालेली कार (एम.एच.४६ बी.९७००) हिचे टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटल्याने सदरील कार विरुद्ध साईटला जाऊन उलटली. याच सुमारास औरंगाबादहून बीडकडे निघालेले कँन्टर (जी.जे.१६ ए.यू. २४७५) च्या खाली हि कार आल्याने कार काही अंतर कँन्टरने कारला फरफटत नेले. यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य तीन गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथोमोपचार करुन बीड जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान या तिघांचाही मृत्यू झाला. मयतामध्ये लातुरचे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे सांगितले जाते. दरम्यान अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक संदीप काळे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक कोंडी सुरळीत करत घटनेचा पंचनामा केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या