MB NEWS: *ब्राह्मण समाजाच्या संघर्षांत पूर्ण ताकतीने सोबत- आ.सुरेश धस* *प्रलंबित मागण्यांसाठी हिवाळी अधिवेशनात सरकारला स्मरण करून देण्याची संघर्ष समितीस ग्वाही*
*ब्राह्मण समाजाच्या संघर्षांत पूर्ण ताकतीने सोबत- आ.सुरेश धस*
*प्रलंबित मागण्यांसाठी हिवाळी अधिवेशनात सरकारला स्मरण करून देण्याची संघर्ष समितीस ग्वाही*
बीड-
ब्राह्मण समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ व्हावे समाजातील तरूणांना उद्योग सुरू करता यावेत त्यांना आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी आपण आग्रही आहोतच मला समाजाच्या सर्व मागण्या माहीत आहेत ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या संघर्षात मी पूर्ण ताकतीने सोबत आहे असे सांगत हिवाळी अधिवेशनात सरकारला या बाबत योग्य रीतीने स्मरण करून देणार असल्याची ग्वाही आ.सुरेश धस यांनी प्रलंबित मागण्यांचे स्मरणपत्र स्वीकारताना संघर्ष समिती शिष्टमंडळास दिली.
ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीने जागो सरकार जागो आंदोलन सुरू आहे. राज्यातील सर्व पक्षीय आजी माजी मंत्री, खासदार, आमदार या सर्व लोकप्रतिनिधींना स्मरण करून दिले जात आहे. याच प्रलंबित मागण्यांचे मंगळवार रोजी माजी मंत्री तथा बीड,उस्मानाबाद,लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचे आमदार सुरेश धस यांची आष्टी येथे त्यांच्या निवासस्थानी समितीचे मुख्य समन्वयक प्रमोद पुसरेकर, प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे,नितीन कुलकर्णी,अशोक कडेकर,अनंता जोशी,गजानन घायाळ,सुमित देशपांडे,विठ्ठल कुलकर्णी,महेंद्र पोतदार,मनोहर पोतदार,विजय सहस्त्रबुद्धे,मनोज देशपांडे, मंगेश कुलकर्णी,सचिन रानडे,शैलेश सहस्त्रबुद्धे
रोहित देशपांडे,प्रसाद देशपांडे यांनी भेट घेऊन स्मरणपत्र दिले. यावेळी आ.सुरेश धस यांनी समाजाच्या प्रलंबित मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करत ब्राह्मण समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ होणे गरजेचे यासाठी आहे की मला समाजाच्या अडीअडचणी माहीत आहेत ब्राह्मण समाज माझ्या सोबत कायम राहिला आहे, अडचणीच्या काळात देखील समाज भक्कम साथ कसलीही अपेक्षा न करता मला देत आला आहे. एक कुटुंबातील सदस्य असल्याप्रमाणे मी त्यांच्या सोबत आणि ते माझ्या सोबत आहेत. समाजात बुद्धीमत्ता आहे पण सरकारी नोकरीचे प्रमाण कमी झाले आहे, अनेक तरुण होतकरू असताना देखील आर्थिक पाठबळ मिळत नसल्याने उद्योग व्यवसाय करू शकत नाहीत, समाजाचा आर्थिकस्तर खालावला आहे अशा परिस्थितीत समाजाच्या उन्नतीसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ हा सक्षम उपाय आहे. यासाठी सर्व प्रकिया भाजपा सरकारच्या काळात पूर्ण करण्यात आली होती मधल्या काळात सरकार मध्ये होऊ नये ते बदल झाले आणि ते राहून गेले समाजाच्या संघर्षात मी कायम ताकतीने सॊबत असून प्रलंबित मागण्यासाठी हिवाळी अधिवेशनात सरकारला या बाबत योग्य रीतीने स्मरण करून देणार असल्याची ग्वाही आ.सुरेश धस त्यांनी यावेळी दिली.समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीने जागो सरकार जागो आंदोलना अंतर्गत राज्यातील सर्व पक्षीय आजी माजी मंत्री, खासदार, आमदार या सर्व लोकप्रतिनिधींना प्रलंबित मागण्यांचे निवेदन देऊन स्मरण करून देण्यात येत असून शासन-प्रशासनाने तात्काळ ठोस पावले न उचलल्यास आंदोलनाचा तिसरा टप्पा आणखी तीव्र करणार असल्याचेही समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती च्या वतीने सांगण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा