मोठ्या संख्येने उपस्थित रहा....

इमेज
द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आज आयोजन परळी वैजनाथ | प्रतिनिधी द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालय, परळी वैजनाथ यांच्या वतीने २० वे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे स्नेहसंमेलन आज  बुधवार, दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे  नटराज रंग मंदिर, परळी वैजनाथ येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामलिंग राजनळे सर (माजी मुख्याध्यापक, वैद्यनाथ विद्यालय) राहणार असून उद्घाटन  गणेश गिरी (गटशिक्षणाधिकारी, गटसाधन केंद्र, परळी वै.) यांच्या हस्ते होणार आहे. या काकार्यक्रमास बाजीराव  भैय्या   धर्माधिकारी (माजी नगराध्यक्ष),  कोकणे  (विस्ताराधिकारी),  धनंजय ढोणे  (पोलीस निरीक्षक),  दिवाकर जोशी (गझलकार), प्रा. रविंद्र जोशी सर (पत्रकार,  दैनिक पुढारी),  व्यंकटेश शिंदे (नगरसेवक) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.           स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचे नृत...

MB NEWS:उमेद अभियानातील महिलांना न्याय द्या, त्यांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका - पंकजाताई मुंडे*

 *उमेद अभियानातील महिलांना न्याय द्या, त्यांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका - पंकजाताई मुंडे*



*मुंबईत धरणे आंदोलन करणा-या महिलांच्या लढयाला दिली ताकद!*


मुंबई दि.  ------ राज्य सरकारने 'उमेद' अभियानातील महिलांना न्याय द्यावा, अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केली आहे. या मागणीसाठी  आंदोलन करणा-या महिलांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका असे सांगत त्यांनी या लढ्याला आपला पाठिंबा व्यक्त केला आहे.


  ८४ लाख कुटुंबांसाठी काम करणाऱ्या उमेद अभियानाचे खासगीकरण थांबवावे या प्रमुख मागणीसाठी ग्रामीण भागातील हजारो महिलांचा मोर्चा मुंबईत धडकला आहे. आझाद मैदानात या महिलांनी आजपासून धरणे आंदोलन  सुरू केले आहे.  आंदोलनाची दखल घेऊन पंकजाताई मुंडे यांनी फेसबुक पेजवरून उमेदच्या महिलांची बाजू सरकार समोर मांडली आहे.


 आमच्या सरकारच्या काळात उमेद अभियानातील महिलांना न्याय देण्याचं काम आम्ही केलं होतं.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कामाची दखल घेतली होती, त्यांनी अभियानातील महिलांशी ऑनलाईन संवादही साधला होता. तसेच  यवतमाळ व औरंगाबाद येथे लाखो महिलांच्या मेळाव्याला संबोधितही केले होते. उमेदने आपल्या कामातून राज्याला अनेक पहिल्या - दुसऱ्या क्रमांकाचे पुरस्कारही मिळवून दिले आहेत. लाखो गरीब- वंचित महिलांना आपल्या पायावर उभ्या केलेल्या उमेदचे बाजारीकरण सरकारने तात्काळ थांबवावे अशी मागणी त्यांनी केली. मागील चार महिन्यांपासून या महिला आपल्या न्याय मागण्यांसाठी व अस्तित्वासाठी रस्त्यावर उतरून लढा आहेत, सरकारने त्यांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये असेही त्यांनी म्हटले आहे.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....