इमेज
बीड जिल्हयातुन 1599 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये निकाली बीड- आज दिनांक 9 मे 2026 रोजी बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचेउद्घाटन आनंद एल.यावलकर, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते संपन्न झाले.   सदर उदघाटन कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 व्ही.एच. पाटवदकर, जिल्हा न्यायाधीश-2 एस.आर.शिंदे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2 आर.एम नेरलीकर मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर.शिंदे व इतर न्यायिक अधिकारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डाॅ.वहाब ए.सय्यद, बीड मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस.जी.पिसुरे, उपाध्यक्ष आर.व्ही.देशमुख, सचिव सुभाष काळे तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी, विधिज्ञ सदर उदघाटन कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरूनआनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 9 मे 2026 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकूण. 1209 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. बीड...

MB NEWS: *धनंजय मुंडे सात तास जनतेच्या दरबारात रमतात तेव्हा...*

 *धनंजय मुंडे सात तास जनतेच्या दरबारात रमतात तेव्हा...*



परळी (दि. २१) : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी एक दोन तास नव्हे तर तब्बल सात तास परळीत जनता दरबार घेतला. त्यांचा सात तास चाललेला जनता दरबार आलेल्या प्रत्येक व्यक्तीला भेटून त्यांची अडचण/प्रश्न/समस्या समजून घेत ती जिथल्या तिथे सोडवण्याचा प्रयत्न करणे हे त्यांचे वैशिष्ट्य अधोरेखित करणारा ठरला!


विधान परिषद निवडणूक आचार संहिता संपल्यानंतर परळीत ना. मुंडे यांचा हा पहिलाच जनता दरबार असावा; तसे तर माणसं भेटतील तिथेच जनता दरबार आणि तिथून काम मार्गी लावणे हे त्यांच्या जनता दरबाराचे दुसरे वैशिष्ट्य म्हणता येईल!


परळी येथील जगमित्र कार्यालयात आज धनंजय मुंडे हजारो लोकांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात रमले होते. वैयक्तिक कामे, वैयक्तिक अडचणी, सार्वजनिक कामे, विविध मागण्या यासह अगदी कौटुंबिक व गाव गाड्याच्या समस्या घेऊन देखील अनेक लोक ना. मुंडेंना भेटतात. आलेल्या प्रत्येकाचे समाधान करणे एवढ्या मोठ्या गर्दीत बऱ्याचदा शक्य होत नाही, परंतु आलेल्या प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेऊन त्यावर निश्चित कार्यवाही करणे व त्याचे समाधान करूनच परत पाठवणे हे ना. मुंडेंच्या नेहमी चालणाऱ्या जनता दरबाराचे तिसरे व महत्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणता येईल. 



*बीड येथे जिल्ह्याच्या विविध विषयी मंगळवारी सकाळी १०.३०वा महत्वपूर्ण बैठका*


दरम्यान ना. धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील कापूस खरेदी, रब्बी हंगामातील विविध कृषी विषय, राष्ट्रीय महामार्गाचे काम यासह जिल्ह्यातील अन्य महत्वपूर्ण विषयांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....