प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS:प्रत्येक जातीची जनगणना व्हावी, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची मोठी मागणी*

 ⭕⭕⭕

*प्रत्येक जातीची जनगणना व्हावी, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची मोठी मागणी*




कोल्हापूर: केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जनगणनेबाबत मोठी मागणी केली आहे. प्रत्येक जातीची जनगणना व्हावी, असं मत आठवले यांनी मांडलं आहे. कोणत्या जातीचा किती टक्का आहे हे समजत नाही. त्यामुळे 2021 जनगणना जातनिहाय व्हावी, यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार असल्याची माहिती आठवले यांनी कोल्हापुरात बोलताना दिली.

यापूर्वी ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी करण्यात आली होती. आता रामदास आठवले यांनी प्रत्येक जातीची जनगणना व्हावी अशी भूमिका मांडली आहे. त्याचबरोबर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये. मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण द्यावं, असं मत आठवले यांनी व्यक्त केलं आहे. सर्वोच्च न्यायालयही मराठा समाजाचा विचार करेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रातील काही नेते आणि विचारवंतांकडून आर्थिक निकषावर आरक्षण लागू करण्याची मागणी होत आहे. मात्र, त्याला आपला विरोध असल्याचं रामदास आठवले म्हणाले. समाजातून जातीव्यवस्था संपवा, मग आम्ही आरक्षण सोडायला तयार आहोत, अशी भूमिका आठवले यांनी घेतली आहे. अनेक जातींवर आजही अन्याय होतो, त्यामुळे जातीच्या आधारावरच आरक्षण असलं पाहिजे असं मत आठवले यांनी व्यक्त केलं आहे.

जनगणना ही जातीनिहाय करणं आवश्यक आहे. जातीपातीतील संघर्ष टाळण्यासाठी कुणीतरी पुढाकार घेतला पाहिजे. तो आपण घेतला आणि विधानसभेला जातीनिहाय जनगणनेचं महत्वं पटवून दिल्याचं, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी नोव्हेंबरमध्ये साताऱ्यातील वाई इथं बोलताना सांगितलं होतं. जातीनिहाय जनगणना झाली तर सर्वसामान्यांना न्याय देणं शक्य होईल. जातीजातीत भांडणे होणार नाही. आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास समाजाला आरक्षणाचा लाभ देता येईल, असंही पटोले म्हणाले होते.

जातीनिहाय जनगणनेसाठी ओबीसी समाजही आग्रही आहे. अनेक ओबीसी नेत्यांनी सातत्यानं ही मागणी केली आहे. नोव्हेंबरमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तहसील कार्यालयावर मोर्चा काढून ओबीसी समाजानं ही मागणी केली होती. ओबीसी सामाजाची जातीनिहाय जनगणना करावी. ज्यामुळे ओबीसींची प्रत्यक्ष संख्या समजण्यास मदत होईल. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण नको. ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला भरीव मदत देण्यात यावी. ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी. सर्व प्रकारच्या सेवा भरतींवरील स्थगिती उठवावी, अशा मागण्या ओबीसी समाजाच्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या