MB NEWS:शेतकरी संघटना आजच्या बंदमध्ये सामिल नाही - शेतकरी संघटनेचा खुलासा

 शेतकरी संघटना आजच्या बंदमध्ये सामिल नाही - शेतकरी संघटनेचा खुलासा



केंद्र शासनानी केलेल्या शेती सुधारणे विषयीच्या तीन कायद्यास शेतकरी संघटनेचा पांठीबा (शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना ) 

     दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकर्याच्या आंदोलनाला पांठीबा देण्यासाठी आज दि ८ डिंसेबर रोजी होणार्या भारत बंद मध्ये आमची शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना सामिल नाही.

     दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलन पंजाब हरीयानाच्या शेतकर्याना फायद्याचे वाटत असले तरी प्रत्यक्षात शेतकरी हीताचे नाही .कारण शेतकर्याना मिळणारे आर्थिक स्वातंत्य आपण नाकारत आहोत .नविन क्रशी सुधारणा कायदा मागे घेतला तर पुढील पन्नास वर्षे राजकिय पक्ष शेतकर्याच्या शेती व्यापाराला स्वातंञ्य देण्याचे धाडस करणार नाही . केंद्रशासनाने केलेले शेतीविषयीचे कायदे पुर्णपणे रद्द करा म्हणने चुकीचे आहे .या कायद्यात काही प्रमाणात दुरूस्ती करणे आवश्यक आहे.केलेल्या कायद्यामूळे बाजार समिती हमाल व्यापारी तोलाईदार माथाडी पुढारी मनमानी सहण करावी लागणार नाही . या कायद्याने शेतकर्याना शेती ऊत्पादन कंपनी काढण्याचे स्वातंञ्य मिळाले आहे.देशात आपला ऊत्पादीत माल शेतकरी विकू शकतो.शेतकर्याच्या करार शेतीला कियदेशीर मान्यता मिळाली आहे. यातुन एकच सांगायचे झाले तर शेतकर्याना मिळणारे व्यापारी स्वातंञ्य व आर्थिक स्वातंञ्य हेच शेतकर्याना मिळू न देण्याचे हेच व्यापार्याचे राजकिय पक्षाचे राजकिय व सामाजिक संघटनेचे व व्यापारी संघटनेचे षडयंञ आहे.

     

         कैलास सोळंके

   जिल्हा अध्यक्ष  

शेतकरी संघटना युवा आघाडी बीड 

9420016169

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार