दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS-पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांच्या हस्ते संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानातील जिल्ह्य़ात द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक टोकवाडी ग्रामपंचायतीला प्रदान* ● _बीड येथे प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभात सन्मान_●

 पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांच्या हस्ते संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानातील जिल्ह्य़ात द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक टोकवाडी ग्रामपंचायतीला प्रदान  



● _बीड येथे प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभात सन्मान_●


परळी वैजनाथ / प्रतिनिधी..

        प्रत्येक सार्वजनिक कार्यात आपल्या सामाजिक जाणिवा दर्शवत काम करणाऱ्या आणि सामाजिक उपक्रमांची जोड देत गावाच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय असलेल्या टोकवाडी ग्रामपंचायतीने स्वच्छतेच्या कामातह आपला ठसा उमटविलेला आहे.संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात बीड जिल्ह्यातून टोकवाडी ग्रामपंचायतने द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे.या पार्श्वभूमीवर आज २६ जानेवारी रोजी राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभात हे पारितोषिक प्रदान करण्यात आले.

        टोकवाडीच्या सरपंच सौ. गोदावरी राजाराम मुंडे यांच्या माध्यमातून गावातील विविध विकासात्मक बदल मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. वरद गणेश मंडळाचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य डाॅ. राजाराम मुंडे यांच्या मार्गदर्शना खाली टोकवाडी येथे सामाजिक, शैक्षणिक, भौतिक सुविधा, स्वच्छता, शालेय गुणवत्ता आदी सर्वदृष्टीने सातत्यपूर्ण अभिनव उपक्रम राबवत सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न असतो.या अनुषंगानेच स्वच्छतेबाबत जाणीव जागृती बरोबरच घंटागाडी व दैनंदिन स्वच्छता विषयक व्यवस्थापन करत टोकवाडी ग्रामपंचायत जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावून अव्वल ठरली.

        संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन 2018- 19 या वर्षात घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये टोकवाडी तालुका परळी वैजनाथ गावाची जिल्ह्यातून द्वितीय क्रमांकावर निवड करण्यात आलेली आहे. आज बीड येथे पुरस्कार वितरण सोहळा झाला. जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.यावेळी पं.स. सभापती श्री बालाजी मुंडे, सरपंच सौ. गोदावरी राजाराम मुंडे व ग्रामसेवक सौ.आशा क्षीरसागर आदींनी टोकवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने पारितोषिक स्विकारले. पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी पारितोषिक पटकावल्याबद्द्ल टोकवाडी ग्रामपंचायत व गावकऱ्यांचे अभिनंदन केले.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....