इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS-पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांच्या हस्ते संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानातील जिल्ह्य़ात द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक टोकवाडी ग्रामपंचायतीला प्रदान* ● _बीड येथे प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभात सन्मान_●

 पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांच्या हस्ते संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानातील जिल्ह्य़ात द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक टोकवाडी ग्रामपंचायतीला प्रदान  



● _बीड येथे प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभात सन्मान_●


परळी वैजनाथ / प्रतिनिधी..

        प्रत्येक सार्वजनिक कार्यात आपल्या सामाजिक जाणिवा दर्शवत काम करणाऱ्या आणि सामाजिक उपक्रमांची जोड देत गावाच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय असलेल्या टोकवाडी ग्रामपंचायतीने स्वच्छतेच्या कामातह आपला ठसा उमटविलेला आहे.संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात बीड जिल्ह्यातून टोकवाडी ग्रामपंचायतने द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे.या पार्श्वभूमीवर आज २६ जानेवारी रोजी राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभात हे पारितोषिक प्रदान करण्यात आले.

        टोकवाडीच्या सरपंच सौ. गोदावरी राजाराम मुंडे यांच्या माध्यमातून गावातील विविध विकासात्मक बदल मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. वरद गणेश मंडळाचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य डाॅ. राजाराम मुंडे यांच्या मार्गदर्शना खाली टोकवाडी येथे सामाजिक, शैक्षणिक, भौतिक सुविधा, स्वच्छता, शालेय गुणवत्ता आदी सर्वदृष्टीने सातत्यपूर्ण अभिनव उपक्रम राबवत सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न असतो.या अनुषंगानेच स्वच्छतेबाबत जाणीव जागृती बरोबरच घंटागाडी व दैनंदिन स्वच्छता विषयक व्यवस्थापन करत टोकवाडी ग्रामपंचायत जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावून अव्वल ठरली.

        संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन 2018- 19 या वर्षात घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये टोकवाडी तालुका परळी वैजनाथ गावाची जिल्ह्यातून द्वितीय क्रमांकावर निवड करण्यात आलेली आहे. आज बीड येथे पुरस्कार वितरण सोहळा झाला. जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.यावेळी पं.स. सभापती श्री बालाजी मुंडे, सरपंच सौ. गोदावरी राजाराम मुंडे व ग्रामसेवक सौ.आशा क्षीरसागर आदींनी टोकवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने पारितोषिक स्विकारले. पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी पारितोषिक पटकावल्याबद्द्ल टोकवाडी ग्रामपंचायत व गावकऱ्यांचे अभिनंदन केले.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या