इमेज
  घरकुल लाभार्थ्यांची थट्टा थांबवा, अन्यथा आंदोलन; महादेव गंगणे पाटील यांचा परळी पालिकेला इशारा परळी वैजनाथ (प्रतिनिधी) रमाई घरकुल योजनेंतर्गत १५४ लाभार्थ्यांना १ कोटी १ लाख ८१ हजार २५० रुपयांचा निधी वर्ग केल्याच्या बातम्या प्रसिद्ध करून स्वतःची पाठ थोपवून घेणाऱ्या परळी नगर परिषदेचा फुगा फुटला आहे. प्रत्यक्षात एकाही लाभार्थ्याला रुपया देखील मिळाला नसून, नगर परिषदेने केवळ कागदी घोडे नाचवले असल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष महादेव गंगणे पाटील यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी प्रशासनाला तीव्र जाब विचारला आहे. प्रसिद्धीचा स्टंट, प्रत्यक्षात लाभार्थी वंचित महादेव गंगणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे नगर परिषदेच्या कारभारावर तीव्र आक्षेप घेतला आहे. नगर परिषदेने काही दिवसांपूर्वी रमाई आवास योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणावर निधी वाटप केल्याचा दावा प्रसिद्धी माध्यमांद्वारे केला होता. मात्र, प्रत्यक्षात जेव्हा लाभार्थ्यांनी त्यांच्या बँक खात्यांची तपासणी केली, तेव्हा त्यांच्या हाती निराशाच आली. अनेक गरीब आणि गरजू लाभार्थी अद्यापही पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्यापासून वंचित आहे...

MB NEWS: *पत्रकारीतेत येणार्‍या नव्या पिढीने व्यासंग वाढवावा-प्रशांत जोशी* *अखिल भारतीय पत्रकार परिषद मुंबई शाखा परळीच्या वतीने दर्पनदिन साजरा*

 *पत्रकारीतेत येणार्‍या नव्या पिढीने व्यासंग वाढवावा-प्रशांत जोशी*



*अखिल भारतीय पत्रकार परिषद मुंबई शाखा परळीच्या वतीने दर्पनदिन साजरा*

परळी,(प्रतिनिधी):-पत्रकारितेत येणार्‍या नव्या पिढीने व्यासंग वाढवावा सर्व सामान्यांच्या समस्या अग्रक्रमाने मांडून बदलत्या परिस्थितीची आव्हाने स्विकारावीत असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार प्रशांत जोशी यांनी केले.

  अखिल भारतीय पत्रकार परिषद मुंबई शाखा परळीच्या वतीने दि.6 जानेवारी 2021 रोजी दै.न्याय टाईम्स कार्यालयात दर्पनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी श्री.जोशी बोलत होते. यावेळी जेष्ठ पत्रकार ओमप्रकाश बुरांडे, ता.समन्वय धनंजय आरबुने, जेष्ट पत्रकार ह.भ.प.विश्वास महाराज पांडे, संपादक बालकिशन सोनी, दत्तात्रय काळे, स्वानंद पाटील, महादेव शिंदे, प्रा.प्रविण फुटके, जगदीश शिंदे, प्रा.राजु कोकलगावे, अनंत कुलकर्णी, दिगांबर देशमुख,आत्मलिंग शेटे, श्रीराम लांडगे, नरसिंग बापु अन्नलदास यांच्यासह इतर पत्रकार बांधव उपस्थित होते.

 यावेळी प्रशांत जोशी यांनी पत्रकारीतेपुढील आव्हाने याविषयी विचार मांडले. इतर मध्ययमंचा प्रभाव वाढला तरी प्रिंट मिडीयाचे महत्व आजही कायम असल्याचे ते म्हणाले. प्रस्ताविक जगदीश शिंदे यांनी केले. यावेळी श्री.बुरांडे,  श्री.काळे यांनी विचार मांडले. सुत्रसंचलन धनंजय आरबुने यांनी तर आभार प्रदर्शन बालकिशन सोनी यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....