दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS: *माणसाला ऊर्जा देणाऱ्या निसर्गाला जपा.- गणेश आघाव* *पोरी शाळेत निघाल्या या गीताचे शानदार कार्यक्रमात लॉन्चिंग*

 *माणसाला ऊर्जा देणाऱ्या निसर्गाला जपा.- गणेश आघाव*



*पोरी शाळेत निघाल्या या गीताचे शानदार कार्यक्रमात लॉन्चिंग*


परळी प्रतिनिधी -: आपल्या अवतीभोवती असणाऱ्या निसर्गातून माणसाला ऊर्जा मिळते, त्या ऊर्जेला आपण जपले पाहिजे अन्यथा असमतोल निर्माण होतो ,असे साहित्य अकादमी पुरस्कार नामांकन प्राप्त कवी गणेश आघाव यांनी प्रतिपादन केले आहे. तर अरुण पवार यांनी कविता आणि गीतांमधून लाखो लोकांपर्यंत पोहोचता येते असे उद्घाटन पर भाषणात बोलताना सांगितले.

  परळी येथील शिवछत्रपती विद्यालयात पोरी शाळेत निघाल्या या गीताचे लॉन्चिंग करण्यात आले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शिवछत्रपती विद्यालयात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख चेनलवाडसाहेब हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. राजकुमार यल्लावाड ,कवी अनंत मुंडे ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक रानबा गायकवाड कवी केशव कुकडे, रघुनाथ आंधळे, शिवछत्रपती विद्यालयाचे पर्यवेक्षक प्रकाश पाटील आदी उपस्थित होते .

  गीतकार गणेश आघाव यांनी लिहिलेले पोरी शाळेत निघाल्या हे गीत आजवर बत्तीस भाषेत भाषांतरीत झालेलं आहे.हे गीत आता व्हिडिओ स्वरुपात पहायला मिळणार आहे.परळी वै.येथीलच आदर्श शिक्षक , चित्रकार कवी सिद्धेश्वर इंगोले यांनी स्वरबद्ध आणि संगीतबद्ध केले आहे तसेच रानबा गायकवाड यांनी दिग्दर्शन केले आहे.याप्रसंगी या गीताचे लॉन्चिंग करण्यात आले.या प्रसंगी गीतातील कलाकार व विद्यार्थीनी,तंत्रज्ञ यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.



         कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिद्धेश्वर इंगोले , सूत्रसंचालन अशोक फड यांनी तर आभार सचिन कर्णर यांनी मानले. या कार्यक्रमास लक्ष्मण लाड ,आनंद व्हावळे ,दिवाकर जोशी, गणगोपलवाड पत्रकार विकास, वाघमारे ,विद्याधर शिरसाठ,विष्णू तोडकर, भाऊसाहेब सोळंके, सचिन खरात , बापुराव खोतपाटील संतोष मेंडके ,अंकुश चव्हाण, नाना रोडे ,इबितवार, आकाश देवरे ,महेश मुंडे आदी शिक्षक व विद्यार्थी विद्यार्थी पालक मोठया संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....