परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS-छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्मसमभाव दृष्टिकोण जोपासला– ऍड मनोज संकाये* *छत्रपती शिवाजी महाराज यांची 341 वी जयंती साजरी!*

 छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्मसमभाव दृष्टिकोण जोपासला– ऍड मनोज संकाये


छत्रपती शिवाजी महाराज यांची 341 वी जयंती साजरी!


परळी /प्रतिनिधी


अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या संबंध कारकिर्दीत सर्व धर्म समभाव दृष्टिकोण जोपासला असे प्रतिपादन ऍड मनोज संकाये यांनी केले.



    छत्रपती शिवाजी महाराजांची 341 वी जयंती साजरी करण्यात आली यावेळी शिवाजी चौकातील महाराजांच्या अश्वरुढ पुतळ्याला हार घालून अभिवादन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते महाराजांनी आपल्या स्वराज्यात प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना सन्मानपूर्वक आणि आदराची वागणूक दिली त्यांच्या धर्माची तत्वे यांचे रक्षण करण्याचे काम केले आणि प्रत्येक धर्म माणुसकी शिकवतो मानवता हाच प्रत्येक धर्माचा पाया आहे असे ते म्हणत आपल्या स्वराज्यात मज्जिद बांधणारा राजा म्हणून त्यांची ख्याती जगप्रसिद्ध आहे. प्रत्येक धर्म हा समानतेची शिकवण देतो म्हणून प्रत्येकानेच इतर धर्मांना तुच्छ लेखू नये तर त्यांच्याप्रती समभाव दृष्टिकोन जोपासावा असे ऍड मनोज संकाये यांनी सांगितले.


    या कार्यक्रमाला मुंजाभाऊ साठे ,विवेक दांडगे ,मुंजाभाऊ गरड ,दीपक शेटे , अनिल चौधरी ,सोमनाथ दौंड ,मुन्ना चव्हाण ,बालासाहेब गुट्टे ,ज्ञानदेव आंबुरे ,राम चाटे ,विलास गिते, वाघा रोडे ,सुंदर आव्हाड, नाना अचारे ,कैलास साठे, शिवा बडे, संतोष कांबळे ,संजय पाटील, दगडू भाळे , सोहेल तहीत आदीसह युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!