इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्मसमभाव दृष्टिकोण जोपासला– ऍड मनोज संकाये* *छत्रपती शिवाजी महाराज यांची 341 वी जयंती साजरी!*

 छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्मसमभाव दृष्टिकोण जोपासला– ऍड मनोज संकाये


छत्रपती शिवाजी महाराज यांची 341 वी जयंती साजरी!


परळी /प्रतिनिधी


अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या संबंध कारकिर्दीत सर्व धर्म समभाव दृष्टिकोण जोपासला असे प्रतिपादन ऍड मनोज संकाये यांनी केले.



    छत्रपती शिवाजी महाराजांची 341 वी जयंती साजरी करण्यात आली यावेळी शिवाजी चौकातील महाराजांच्या अश्वरुढ पुतळ्याला हार घालून अभिवादन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते महाराजांनी आपल्या स्वराज्यात प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना सन्मानपूर्वक आणि आदराची वागणूक दिली त्यांच्या धर्माची तत्वे यांचे रक्षण करण्याचे काम केले आणि प्रत्येक धर्म माणुसकी शिकवतो मानवता हाच प्रत्येक धर्माचा पाया आहे असे ते म्हणत आपल्या स्वराज्यात मज्जिद बांधणारा राजा म्हणून त्यांची ख्याती जगप्रसिद्ध आहे. प्रत्येक धर्म हा समानतेची शिकवण देतो म्हणून प्रत्येकानेच इतर धर्मांना तुच्छ लेखू नये तर त्यांच्याप्रती समभाव दृष्टिकोन जोपासावा असे ऍड मनोज संकाये यांनी सांगितले.


    या कार्यक्रमाला मुंजाभाऊ साठे ,विवेक दांडगे ,मुंजाभाऊ गरड ,दीपक शेटे , अनिल चौधरी ,सोमनाथ दौंड ,मुन्ना चव्हाण ,बालासाहेब गुट्टे ,ज्ञानदेव आंबुरे ,राम चाटे ,विलास गिते, वाघा रोडे ,सुंदर आव्हाड, नाना अचारे ,कैलास साठे, शिवा बडे, संतोष कांबळे ,संजय पाटील, दगडू भाळे , सोहेल तहीत आदीसह युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!