प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS-छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्मसमभाव दृष्टिकोण जोपासला– ऍड मनोज संकाये* *छत्रपती शिवाजी महाराज यांची 341 वी जयंती साजरी!*

 छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्मसमभाव दृष्टिकोण जोपासला– ऍड मनोज संकाये


छत्रपती शिवाजी महाराज यांची 341 वी जयंती साजरी!


परळी /प्रतिनिधी


अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या संबंध कारकिर्दीत सर्व धर्म समभाव दृष्टिकोण जोपासला असे प्रतिपादन ऍड मनोज संकाये यांनी केले.



    छत्रपती शिवाजी महाराजांची 341 वी जयंती साजरी करण्यात आली यावेळी शिवाजी चौकातील महाराजांच्या अश्वरुढ पुतळ्याला हार घालून अभिवादन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते महाराजांनी आपल्या स्वराज्यात प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना सन्मानपूर्वक आणि आदराची वागणूक दिली त्यांच्या धर्माची तत्वे यांचे रक्षण करण्याचे काम केले आणि प्रत्येक धर्म माणुसकी शिकवतो मानवता हाच प्रत्येक धर्माचा पाया आहे असे ते म्हणत आपल्या स्वराज्यात मज्जिद बांधणारा राजा म्हणून त्यांची ख्याती जगप्रसिद्ध आहे. प्रत्येक धर्म हा समानतेची शिकवण देतो म्हणून प्रत्येकानेच इतर धर्मांना तुच्छ लेखू नये तर त्यांच्याप्रती समभाव दृष्टिकोन जोपासावा असे ऍड मनोज संकाये यांनी सांगितले.


    या कार्यक्रमाला मुंजाभाऊ साठे ,विवेक दांडगे ,मुंजाभाऊ गरड ,दीपक शेटे , अनिल चौधरी ,सोमनाथ दौंड ,मुन्ना चव्हाण ,बालासाहेब गुट्टे ,ज्ञानदेव आंबुरे ,राम चाटे ,विलास गिते, वाघा रोडे ,सुंदर आव्हाड, नाना अचारे ,कैलास साठे, शिवा बडे, संतोष कांबळे ,संजय पाटील, दगडू भाळे , सोहेल तहीत आदीसह युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या