इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS-सर्व सामान्यांच्या हिताचा अर्थपूर्ण अर्थसंकल्प* पंकजाताई मुंडे यांनी केले केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत*

 *सर्व सामान्यांच्या हिताचा अर्थपूर्ण अर्थसंकल्प*



पंकजाताई मुंडे यांनी केले केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत* 


मुंबई। दिनांक ०१।

कोरोना नंतर आलेले संकट लक्षात घेऊन आरोग्य, उद्योग, शेती, पायाभूत सुविधा यासह सर्व क्षेत्रांना उभारी देणारा आणि सर्व सामान्यांच्या हिताचा अर्थपूर्ण अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडला आहे अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.


   कोरोनाच्या महा भयानक संकटानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने अर्थसंकल्पात आरोग्य सुविधा अधिक बळकट करण्यावर भर दिला आहे, कोरोना लसीकरणासाठी ३५ हजार कोटीची तरतूद यात करण्यात आली आहे. आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सेवा सुविधा, करोना प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याबरोबरच शेती व उद्योग क्षेत्राला मंदीतून बाहेर काढण्यावर यात भर देण्यात आला आहे. शेती मालाला दीडपट भाव, हमी भावाने खरेदी, मजूरांसाठी अन्न सुरक्षा योजना, रस्ते, लहान सिंचन प्रकल्प, लघुउद्योग, पंतप्रधान आत्मनिर्भर योजना, उज्ज्वला योजना, ग्रामीण पायाभूत योजना आदी विविध क्षेत्रांसाठी तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे, एकूणच या अर्थसंकल्पाने शेती, उद्योगांसह सर्व सामान्यांच्या हिताचा विचार केला असल्याचे पंकजाताई मुंडे यांनी म्हटले आहे.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या