इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-वैद्यनाथ कारखान्याने ऊस बिलापोटी शेतकऱ्यांना दिले २ हजार रूपये* *ऊस उत्पादकांनी मानले पंकजाताई मुंडे यांचे आभार*

 *वैद्यनाथ कारखान्याने ऊस बिलापोटी शेतकऱ्यांना दिले २ हजार रूपये*



*ऊस उत्पादकांनी मानले पंकजाताई मुंडे यांचे आभार* 


_गळीत हंगाम जोमाने सुरू ; शेतकऱ्यांत उत्साहाचे वातावरण !_


परळी । दिनांक ०३। 

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांना ऊस बिलापोटी २ हजार रूपये बॅकेत वर्ग केले आहेत. वेळेवर पैसे मिळाल्याने आनंदित झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्याच्या अध्यक्षा पंकजाताई मुंडे यांचे आभार मानले आहेत. दरम्यान, कारखान्याचा गळीत हंगाम सध्या जोमाने सुरू असल्याने शेतकऱ्यांत मोठा उत्साह जाणवत व आहे. 


    यंदा कारखान्यासमोर अनेक अडचणी होत्या परंतू त्या सर्व अडचणींवर मात करून कारखान्याच्या अध्यक्षा पंकजाताई मुंडे यांनी केवळ आणि केवळ ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेतले आणि कारखाना सुरू केला. १६ डिसेंबर रोजी प्रत्यक्ष गळीत हंगामास सुरवात झाली, तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे गेल्या ४६ दिवसात कारखान्याने एक लाख ३८ हजार मे टन ऊस गाळप केला असून एक लाख १६ हजार साखर पोती उत्पादित केली आहेत. सध्या तीन हजार ८०० मे टन दैनंदिन क्षमतेने कारखाना ऊस गाळप करत आहे. कारखान्याच्या आवारात सध्या ऊसाने भरलेल्या ट्रॅक, ट्रॅक्टर, बैलगाड्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्षेत असल्याचे दिसून येत आहे.


*पैसे मिळाल्याने शेतकरी आनंदले*

--------------------------------

गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये ३१ डिसेंबर अखेर ऊस गाळप केलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या ऊस बिलापोटी प्रति टन २ हजार रुपये कारखान्याने त्यांच्या बॅक खात्यात वर्ग केले आहेत. ऐन गरजेच्या वेळी पैसे मिळाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण असून परळीची बाजारपेठ फुलून गेली आहे. ऊसाचे बिल दिल्याबद्दल शेतकऱ्यांनी पंकजाताई मुंडे यांचे आभार मानले आहेत.

••••

टिप्पण्या

  1. यात पंकजा चे आभार मनासारखे काय त्यांनी पैसे का फुकट दिलेत का शेतकऱ्याचे पैसे होते ते त्यांच्या मालाचे पैसे

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!