प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS-रयतेचे राजे छ.शिवाजी महाराजांना अभिप्रेत कार्य करावे - भगवान साकसमुद्रे लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन येथे शिवजयंती साजरी

 रयतेचे राजे छ.शिवाजी महाराजांना अभिप्रेत कार्य करावे - भगवान साकसमुद्रे 



लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन येथे शिवजयंती साजरी 


परळी (प्रतिनिधी) : रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि कार्य संपूर्ण विश्वाला प्रेरणादायी असून त्यांना अभिप्रेत असलेले कार्य मराठा-बहुजन युवकांनी करावे असे प्रतिपादन फुले-आंबेडकरी अभ्यासक तथा पत्रकार भगवान साकसमुद्रे यांनी दि.१९ फेब्रुवारी २०२१ रोजी लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन येथे ३९१ व्या शिवजयंती निमित्त बोलतांना केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार दिलीप बद्दर तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रल्हाद कंडूकटले, दत्ता लांडे, विजय देशमुख, पत्रकार अमोल सूर्यवंशी, हर्षद शिंदे उपस्थित होते. 


साकसमुद्रे पुढे म्हणाले की, महात्मा जोतीराव फुलेंनी दि.१९ फेब्रुवारी १८६९ रोजी शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली व रायगडावर जगात प्रथमच शिवजयंती उत्सव सुरु केला. प्रबोधनकार ठाकरें म्हणत शिवाजी महाराजांच्या नावापुढे ३३ कोटी देवांची पलटण बाद होते, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात शिवबांना वंदन करून करत असत. कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्था काढून शिवाजी महाराजांचे कार्य पुढे न्हेले. तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर बदलापूर येथे झालेल्या ३०० व्या शिवजयंतीचे अध्यक्षस्थानी होते असेही ते म्हणाले. 

 

यावेळी जयपाल कांबळे, आकाश देवरे, पत्रकार विकास वाघमारे, रंगनाथ साऊजी, भगवान रोडे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संपादक प्रा.दशरथ रोडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार पत्रकार माणिक कोकाटे यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या