इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-रयतेचे राजे छ.शिवाजी महाराजांना अभिप्रेत कार्य करावे - भगवान साकसमुद्रे लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन येथे शिवजयंती साजरी

 रयतेचे राजे छ.शिवाजी महाराजांना अभिप्रेत कार्य करावे - भगवान साकसमुद्रे 



लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन येथे शिवजयंती साजरी 


परळी (प्रतिनिधी) : रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि कार्य संपूर्ण विश्वाला प्रेरणादायी असून त्यांना अभिप्रेत असलेले कार्य मराठा-बहुजन युवकांनी करावे असे प्रतिपादन फुले-आंबेडकरी अभ्यासक तथा पत्रकार भगवान साकसमुद्रे यांनी दि.१९ फेब्रुवारी २०२१ रोजी लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन येथे ३९१ व्या शिवजयंती निमित्त बोलतांना केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार दिलीप बद्दर तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रल्हाद कंडूकटले, दत्ता लांडे, विजय देशमुख, पत्रकार अमोल सूर्यवंशी, हर्षद शिंदे उपस्थित होते. 


साकसमुद्रे पुढे म्हणाले की, महात्मा जोतीराव फुलेंनी दि.१९ फेब्रुवारी १८६९ रोजी शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली व रायगडावर जगात प्रथमच शिवजयंती उत्सव सुरु केला. प्रबोधनकार ठाकरें म्हणत शिवाजी महाराजांच्या नावापुढे ३३ कोटी देवांची पलटण बाद होते, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात शिवबांना वंदन करून करत असत. कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्था काढून शिवाजी महाराजांचे कार्य पुढे न्हेले. तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर बदलापूर येथे झालेल्या ३०० व्या शिवजयंतीचे अध्यक्षस्थानी होते असेही ते म्हणाले. 

 

यावेळी जयपाल कांबळे, आकाश देवरे, पत्रकार विकास वाघमारे, रंगनाथ साऊजी, भगवान रोडे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संपादक प्रा.दशरथ रोडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार पत्रकार माणिक कोकाटे यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!