प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS-छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आजच्या समाजाला आवश्यक- प्रा. प्रवीण फुटके

 छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आजच्या समाजाला आवश्यक- प्रा. प्रवीण फुटके



परळी वैजनाथ, प्रतिनिधी......

    जवहार शिक्षण संस्था संचलित वैद्यनाथ कॉलेजमध्ये इतिहास विभागाअंतर्गत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची 391वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी प्रा प्रवीण फुटके यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आजच्या समाजाला आवश्यक आहेत असे मत प्रतिपादन केले. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर के इप्पर , उपप्राचार्य डॉ जे. व्ही. जगतकर प्राध्यापक प्रतिनिधी प्रा. डि.के आंधळे व प्रमुख व्याख्याते, परळी पत्रकार संघाचे सचिव व कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयातील प्रा. प्रवीण फुटके यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात इतिहास विभाग प्रमुख डॉ. बी.के.शेप यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावर थोडक्यात प्रकाश टाकला. तर प्रमुख वक्ते प्रा.फुटके यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकीय पैलूवर विचारमंथन केले. त्यात त्यांनी महाराष्ट्रातील जाती व्यवस्था, दुष्काळ,स्त्री भ्रूण हत्या, विविध क्षेत्रातील भ्रष्टाचार अशा विविध समस्या मोठ्या प्रमाणात होत आहेत, त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची आवश्यकता आहे असे मत या प्रसंगी व्यक्त केले. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जातीतील लोकांनी आपापले समाजसुधारक व थोर महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजर्‍या केल्या जात आहे असे होत असेल तर त्यात सर्वसमावेशकता दिसून येत नाही अशा पद्धती बंद झाल्या पाहिजेत तसेच छत्रपती शिवाजी महाराज एका विशिष्ट जातीचे नव्हते तर ते संपूर्ण देशाचे थोर महापुरुष होते असेही मत याप्रसंगी व्यक्त केले म्हणून त्यांना एका विशिष्ट जातीच्या बंधनात ठेवू नये असेही त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रशासनात विविध जाती-धर्माचे लोक होते त्यांच्या आधारावरच त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असेही सांगितले. अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य,डॉ.आर. के.इप्पर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची माहिती सांगत असताना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य अखंड महासागरासारखे आहे. त्यांच्या विविध पैलूवर संशोधन केले जात आहे असे सांगून अशा प्रकारचे संशोधन दर्जा उंचावण्यासाठी संशोधन निपक्षपातीपणे व्हावे व केलेले संशोधन ग्रन्थ प्रकाशित करावे अशीही अपेक्षा याप्रसंगी व्यक्त केली. या प्रसंगी डॉ शेप बी. के. यांनी संपादित केलेला छत्रपती शाहू महाराज यांच्या सामाजिक सुधारणा व सद्यस्थिती हा ग्रंथ प्रा.फुटके सरांना भेट दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. एम.जी. लांडगे यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या