दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS- *पुजा चव्हाण मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशी करा- तृप्ती देसाई* • _परळीत येउन घेतली मयत पुजाच्या कुटुंबियांची भेट_ •

 *पुजा चव्हाण मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशी करा- तृप्ती देसाई*

• _परळीत येउन घेतली मयत पुजाच्या कुटुंबियांची भेट_ •


.

     परळी वैजनाथ : एमबी न्युज वृत्तसेवा..

  भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आज दुपारी परळीमध्ये येऊन मयत पुजा चव्हाणच्या कुटुंबियांची भेट घेतली.या भेटीनंतर बोलताना तृप्ती देसाई यांनी पुजा चव्हाण मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशी करा अशी मागणी केली आहे.पूजाच्या मृत्यूचे सत्य बाहेर आले पाहिजे, तिला न्याय मिळायला हवा. यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

         परळी येथील वसंतनगर तांडा येथे पूजा चव्हाण यांच्या नातेवाईकांच्या भेटी दरम्यान आज शनिवारी(दि.२०) दुपारी त्या बोलत होत्या. पूजा चव्हाणच्या मृत्यूला दोन आठवडे उलटले आहेत. मात्र पोलिसांच्या हाती ठोस काहीही लागलेलं नाही. त्यामुळे विरोधकांकडून ठाकरे सरकारवर टीका होत आहे. आज दुपारी भूमाता ब्रिगेडच्या तृत्पी देसाई यांनी परळी येथील वसंत नगर तांडा येथे पूजाच्या नातेवाईकांची भेट देऊन विचारपूस केली. यावेळी त्यांनी आपण पूजाला न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करणार आहोत असे सांगितले. राज्यातील एखादा मंत्री गायब कसा काय होऊ शकतो असा प्रश्न उपस्थित करून या प्रकरणातील दोषींवर तत्काळ गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली. तसेच या प्रकरणातील सत्य बाहेर आले पाहिजे यासाठी सीबीआय चौकशी करावी असेही त्या म्हणाल्या.


---------------------------------------------------------------------

---------------------------------------------------------------------

  💢_दिवसभरातील घडामोडींचा वेगवान आढावा पाहण्यासाठी, वाचण्यासाठी......._ 

*MB NEWS यु ट्युब चॅनलला  Subscribe नक्की करा.* 💢

https://youtube.com/channel/UCrcd4hE8kzoLp5Q67-0nFeg

--------------------------------------------------------------------

---------------------------------------------------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....