इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS- *गाव सुंदर करण्याचा टोकवाडी ग्रामस्थांनी केला निर्धार; 'माझं गाव -सुंदर गाव' अभियानाचा टोकवाडी येथे शुभारंभ*

 *गाव सुंदर करण्याचा टोकवाडी ग्रामस्थांनी केला निर्धार; 'माझं गाव -सुंदर गाव' अभियानाचा टोकवाडी येथे शुभारंभ*



परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

         प्रत्येक सार्वजनिक कार्यात आपल्या सामाजिक जाणिवा दर्शवत काम करणाऱ्या आणि सामाजिक उपक्रमांची जोड देत गावाच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय असलेल्या टोकवाडी ग्रामपंचायतीने स्वच्छतेच्या कामातह आपला ठसा उमटविलेला आहे.संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात बीड जिल्ह्यातून टोकवाडी ग्रामपंचायतने द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे.या पार्श्वभूमीवर आपले गाव आणखी सुंदर करण्याचा टोकवाडी ग्रामस्थांनी निर्धार केला असुन 'माझं गाव -सुंदर गाव' अभियानाचा टोकवाडी येथे दि.४ रोजी शुभारंभ करण्यात आला.



         'माझं गाव -सुंदर गाव' या अभियानासाठी परळी तालुक्यातून टोकवाडी, गाढे पिंपळगाव व देशमुख टाकळी या तीन गावाची निवड करण्यात आली आहे. त्याअंतर्गत 'माझं गाव -सुंदर गाव' अभियानाचा शुभारंभ टोकवाडी येथे मान्यवरांच्या हस्ते झाला.यावेळी पंचायत समितीचे सभापती श्री बालाजी मुंडे, बीडीओ संजय केंद्रे , गावच्या सरपंच गोदावरी राजाराम मुंडे, विस्ताराधिकारी श्री बाबळे, श्री गोडभरले, शाळेचे मुख्याध्यापक श्री यवतेकर, अंगणवाडी सुपरवायझर देशमुख, डॉ. राजाराम मुंडे आदी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडून शुभारंभ करण्यात आला. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय केंद्रे यांनी या अभियानाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक राजाराम मुंडे यांनी केले.सूत्रसंचालन श्री श्याम आघाव सर यांनी केले.हे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी गावकर्यांनी व्यक्त केला.



          कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य श्री तुकाराम काळे, सौ कल्पना मुंडे, संजय मुंडे, सुनील मुंडे, बालाजी आघाव, ग्रामसेवक आशा क्षिरसागर तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, अंगणवाडी कार्यकर्त्या, मदतनिस, आशा वर्कर्स, स्वच्छता ग्रही ,ग्रामपंचायत सर्व कर्मचारी व गावातील नागरिक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट