इमेज
बीड जिल्हयातुन 1599 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये निकाली बीड- आज दिनांक 9 मे 2026 रोजी बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचेउद्घाटन आनंद एल.यावलकर, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते संपन्न झाले.   सदर उदघाटन कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 व्ही.एच. पाटवदकर, जिल्हा न्यायाधीश-2 एस.आर.शिंदे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2 आर.एम नेरलीकर मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर.शिंदे व इतर न्यायिक अधिकारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डाॅ.वहाब ए.सय्यद, बीड मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस.जी.पिसुरे, उपाध्यक्ष आर.व्ही.देशमुख, सचिव सुभाष काळे तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी, विधिज्ञ सदर उदघाटन कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरूनआनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 9 मे 2026 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकूण. 1209 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. बीड...

MB NEWS-आंबेडकरी चळवळीतून स्वाभिमानी कार्यकर्ते निर्माण होतात - बाबुराव पोटभरे

 आंबेडकरी चळवळीतून स्वाभिमानी कार्यकर्ते निर्माण होतात  - बाबुराव पोटभरे 



परळी (प्रतिनिधी) : फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीतून स्वाभिमानी कार्यकर्तेनिर्माण होतात असे प्रतिपादन बहुजन विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष  बाबुराव पोटभरे यांनी परळी येथील भीमनगर येथे दि.८ फेब्रुवारी २०२१ रोजी सायंकाळी, रमाई प्रतिष्ठान आयोजित त्यागमूर्ती रमाई जन्मोत्सोव कार्यक्रमा प्रसंगी केले. यावेळी विचारमंचावर म.गां.रो.ह.यो.सदस्य तथा पं.स.सदस्य श्रीहरी मोरे, प्रा.डॉ.विनोद जगतकर, पं.स.सदस्य मुरलीधर साळवे, अनंत इंगळे, फुले-आंबेडकरी अभ्यासक भगवान साकसमुद्रे, नगरसेवक केशव गायकवाड, किशोर चोपडे, स्वप्नील साळवे आदी उपस्थित होते. या भीमगीताच्या जलसा कार्यक्रमात शुभम मस्के म्हणाले की, आयुष्यभर बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार - प्रसार भीमगीतांच्या माध्यमातून करणार. बाबुराव पोटभरे पुढे म्हणाले की, वर्तमान केंद्र सरकार संविधान व शेतकरी विरोधी असून भांडवलदार अडाणी - अंबानींना खुली सूट देत आहे. या केंद्र सरकारला अद्दल घडविण्याचे काम केवळ आणि केवळ आंबेडकरी चळवळच करू शकते असे त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले. हा कार्यक्रम कोविड-१९ चे सर्व नियमांचे पालन करून घेण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने महिला व पुरुषांची उपस्थिती होती.



    कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमाई प्रतिष्ठानचे सुयोग अवचार, प्रशांत चक्रे, तुषार डोंगरे, नितीन जगतकर, अनंत जगतकर, निशात बनसोडे, रोहन उपाध्याय, सागर हनवते आदींनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....