इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-कोरोनाच्या कठीण काळातील दुप्पट-तिप्पट भरमसाठ दिलेले वीजबिल पूर्ण माफ करा व इंधनाचे दर तात्काळ कमी करा संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदन

 *कोरोनाच्या कठीण काळातील दुप्पट-तिप्पट भरमसाठ दिलेले वीजबिल पूर्ण माफ करा व इंधनाचे दर तात्काळ कमी करा संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदन 



परळी प्रतिनिधी.....

 गेल्या वर्षी मार्च 2020 पासून महाराष्ट्र राज्य, देश व जगभरात कोरोणाच्या महामामारीमुळे राज्यातील मध्यमवर्गीय, व्यापारी, कामगार, शेतकरी सर्वांना अतोनात त्रास झाला असून छोटे-मोठे उद्योगधंदे व्यापार, दुकाने सर्व बंद झाले होते. त्यामुळे सर्वांना आर्थिक झळ बसली गेली हा काळ फक्त जिवंत राहण्यासाठी आहे सर्वांनी काळजी घ्यावी असे आपणच नेहमी माध्यमाद्वारे जनतेचा आवाहन करत होतात मात्र याच कोरोनाच्या काळात वीज वितरण कंपनीने राज्यभरातील जनतेला भरमसाठ वाढीव बिले पाठवली त्यावेळी संभाजी ब्रिगेड सह अनेक पक्ष संघटनांनी आवाज उठवला, आंदोलने केली , तेव्हा आघाडी सरकारचे विज मंत्री श्री. नितीन राऊत यांनी वाढीव बिले माफ करू, कमी करू असे आश्वासन दिले होते, मात्र आता शासनाने थकीत बिले न भरल्यास सर्व नागरिकांचे वीज कनेक्शन कट करण्याची धमकी देऊन नोटीस पाठवले आहेत हा मुस्कटदाबी करण्याचा प्रकार असून हुकूमशाही शासन करीत असल्याची जनसामान्यांची भावना निर्माण झाली आहे. यातून संताप व उद्रेक झाल्यास आपणाच जबाबदार रहाल याची गांभीर्याने नोंद घ्यावी. सामान्यजनतेचा आक्रोश वाढत आहे यामुळे व सर्व नागरिकांचे वाढीव वीज बिले तात्काळ माफ करावे. तसेच नुकतेच केंद्र सरकार व राज्य शासनाने पेट्रोल, डिझेल, गॅस चे दर भरमसाठ वाढवलेले आहेत यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या जनतेला पुन्हा या दरवाढीचा मोठा फटका बसत असून त्यांचे जीवन जगने असह्य झाले आहे,यामुळे या दोन्ही गंभीर विषयी आपण निर्णय घेऊन इंधनाचे वाढलेले दर कमी करावे व वाढीव वीज बिले पूर्णपणे माफ करावेत नसता या जनहिताच्या मागणीसाठी *संभाजी ब्रिगेडच्या* वतीने यापूढे तीव्र आंदोलन करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी ही विनंती..

परळी वै .येथे नायब तहसीलदार बाबूराव रुपनर यांना निवेदन देताना *संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष शिवश्री देवराव लुगडे महाराज संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष शिवश्री सेवकराम जाधव संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष शिवश्री नामदेव भालेराव सामाजिक कार्यकर्ते शिवश्री पवन माने शिवश्री संजय वाळके* आदी उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या