इमेज
बीड जिल्हयातुन 1599 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये निकाली बीड- आज दिनांक 9 मे 2026 रोजी बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचेउद्घाटन आनंद एल.यावलकर, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते संपन्न झाले.   सदर उदघाटन कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 व्ही.एच. पाटवदकर, जिल्हा न्यायाधीश-2 एस.आर.शिंदे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2 आर.एम नेरलीकर मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर.शिंदे व इतर न्यायिक अधिकारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डाॅ.वहाब ए.सय्यद, बीड मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस.जी.पिसुरे, उपाध्यक्ष आर.व्ही.देशमुख, सचिव सुभाष काळे तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी, विधिज्ञ सदर उदघाटन कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरूनआनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 9 मे 2026 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकूण. 1209 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. बीड...

MB NEWS-कोरोनाच्या कठीण काळातील दुप्पट-तिप्पट भरमसाठ दिलेले वीजबिल पूर्ण माफ करा व इंधनाचे दर तात्काळ कमी करा संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदन

 *कोरोनाच्या कठीण काळातील दुप्पट-तिप्पट भरमसाठ दिलेले वीजबिल पूर्ण माफ करा व इंधनाचे दर तात्काळ कमी करा संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदन 



परळी प्रतिनिधी.....

 गेल्या वर्षी मार्च 2020 पासून महाराष्ट्र राज्य, देश व जगभरात कोरोणाच्या महामामारीमुळे राज्यातील मध्यमवर्गीय, व्यापारी, कामगार, शेतकरी सर्वांना अतोनात त्रास झाला असून छोटे-मोठे उद्योगधंदे व्यापार, दुकाने सर्व बंद झाले होते. त्यामुळे सर्वांना आर्थिक झळ बसली गेली हा काळ फक्त जिवंत राहण्यासाठी आहे सर्वांनी काळजी घ्यावी असे आपणच नेहमी माध्यमाद्वारे जनतेचा आवाहन करत होतात मात्र याच कोरोनाच्या काळात वीज वितरण कंपनीने राज्यभरातील जनतेला भरमसाठ वाढीव बिले पाठवली त्यावेळी संभाजी ब्रिगेड सह अनेक पक्ष संघटनांनी आवाज उठवला, आंदोलने केली , तेव्हा आघाडी सरकारचे विज मंत्री श्री. नितीन राऊत यांनी वाढीव बिले माफ करू, कमी करू असे आश्वासन दिले होते, मात्र आता शासनाने थकीत बिले न भरल्यास सर्व नागरिकांचे वीज कनेक्शन कट करण्याची धमकी देऊन नोटीस पाठवले आहेत हा मुस्कटदाबी करण्याचा प्रकार असून हुकूमशाही शासन करीत असल्याची जनसामान्यांची भावना निर्माण झाली आहे. यातून संताप व उद्रेक झाल्यास आपणाच जबाबदार रहाल याची गांभीर्याने नोंद घ्यावी. सामान्यजनतेचा आक्रोश वाढत आहे यामुळे व सर्व नागरिकांचे वाढीव वीज बिले तात्काळ माफ करावे. तसेच नुकतेच केंद्र सरकार व राज्य शासनाने पेट्रोल, डिझेल, गॅस चे दर भरमसाठ वाढवलेले आहेत यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या जनतेला पुन्हा या दरवाढीचा मोठा फटका बसत असून त्यांचे जीवन जगने असह्य झाले आहे,यामुळे या दोन्ही गंभीर विषयी आपण निर्णय घेऊन इंधनाचे वाढलेले दर कमी करावे व वाढीव वीज बिले पूर्णपणे माफ करावेत नसता या जनहिताच्या मागणीसाठी *संभाजी ब्रिगेडच्या* वतीने यापूढे तीव्र आंदोलन करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी ही विनंती..

परळी वै .येथे नायब तहसीलदार बाबूराव रुपनर यांना निवेदन देताना *संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष शिवश्री देवराव लुगडे महाराज संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष शिवश्री सेवकराम जाधव संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष शिवश्री नामदेव भालेराव सामाजिक कार्यकर्ते शिवश्री पवन माने शिवश्री संजय वाळके* आदी उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट