प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS-ना सॅनिटायझर, ना मास्क नागरिक बिनधास्त

 ना सॅनिटायझर, ना मास्क नागरिक बिनधास्त !

सर्वच मुख्य रस्त्यांवर गर्दीच गर्दी असे चित्र आहे. परंतु, अनेकांच्या तोंडावर मास्क नसल्याचे दिसून येते. बहुतांश नागरिक कोरोना गेला... या भ्रमात आहेत. मात्र, दिवसेंदिवस कोरोना रुग्णांत वाढ होत आहे. 




कोरोनापासून बचावासाठी प्राथमिकद़ृष्ट्या संरक्षण म्हणून मास्क, सुरक्षित अंतर, रस्त्यावर थुंकू नये हे नियम करण्यात आले. संसर्ग मोठ्या प्रमाणात होता, तोपर्यंत अगदी काटेकोर अंमलबजावणी झाली. लस आल्यानंतर मात्र जणू कोरोना गेलाच... या आविर्भावात नागरिक बिनधास्त फिरत आहेत. अशा प्रकारामुळे संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. 

    मात्र काही लोकांचे नको तेवढे धाडस वाढले आहे. नियम मोडले जात आहेत. शहराच्या विविध भागांत गर्दीच गर्दी असे चित्र नित्याचेच बनले आहे. सर्वच शासकीय कार्यालये तुडुंब भरलेली दिसत आहेत. कामानिमित्त अनेक नागरिकांची ये-जा वाढलेली आहे. वाहतुकीची कोंडी होत आहे. शहरातील भाजी मंडई, बाजारपेठा, खाऊ गल्ल्यांतून रात्रंदिवस गर्दी होत आहे. शहरातील सर्वच मुख्य रस्त्यांवर गर्दीच गर्दी असे चित्र आहे. परंतु, अनेकांच्या तोंडावर मास्क नसल्याचे दिसून येते. बहुतांश नागरिक कोरोना गेला... या भ्रमात आहेत. मात्र, दिवसेंदिवस कोरोना रुग्णांत वाढ होत आहे. परिणामी, नागरिकांनीच काळजी घेणे आवश्यक आहे.

दुसरी लाट येऊ नये म्हणून काळजी घ्या

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मास्क न वापरणे, सुरक्षित अंतर न पाळणे आदीबाबत दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.वाढत्या रुग्णांची संख्या विचारात घेता कोरोनाची दुसरी लाट येऊ नये म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे. त्यानुसार मास्क न वापरणार्‍या व्यक्ती तसेच दुकाने, हॉटेल्स, रेस्टॉरंट, मंगल कार्यालये, भाजी मार्केट या ठिकाणी मास्क न वापरणे, वाहन चालवताना चेहर्‍यावर अर्धवट मास्क लावणे व गर्दी करून सुरक्षित अंतराचे पालन न करणार्‍या व्यक्तींवर कडक कारवाई केली जाणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या