दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS-सक्तीच्या विजबिल वसुली विरोधात शेतकरी संघटनेचे अनोखे आंदोलन शुक्रवारी ट्रान्सफॉर्मर समोर करणार आत्मक्लेष

 सक्तीच्या विजबिल वसुली विरोधात शेतकरी संघटनेचे अनोखे आंदोलन 



शुक्रवारी ट्रान्सफॉर्मर समोर करणार आत्मक्लेष

सोनपेठ दि.२२(प्रतिनिधी) काही दिवसांपूर्वी विज तोडल्यानंतर विजेच्या खांबावर चढुन आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या आत्म्याला शांती लाभावी व सरकारला सुबुद्धी लाभावी यासाठी वीज वितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मर समोर बसुन दि.२६ रोजी आत्मक्लेष करणार असल्याचे शेतकरी संघटनेचे गणेश पाटील यांनी सांगितले आहे. 

थकीत विज बिलाच्या वसुलीसाठी राज्य शासनाने विज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर टाकलेल्या दबावामुळे कंपनीचे कर्मचारी शेतकऱ्यांची वीज तोडत आहेत. शेतीमध्ये पिके उभी असुन वीज तोडणीच्या सुलतानी संकटामुळे शेतकरी प्रचंड दबावाखाली आले आहेत. या दबावामुळे शेतकरी आत्मघाता सारखा गंभीर मार्ग अवलंबत आहे. 

पंजाब व हरियाणा च्या शेतकऱ्यांना पाठींबा देणारे राज्य सरकार राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीत वीज बिल बसुलीचा खंजीर खुपसत आहे. 

या वसुलीसाठी वीज तोडल्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने वीजेच्या खांबावर चढुन आपला जीव दिला. राज्यातील शेतकरी हे सक्तीच्या वसुलीमुळे प्रचंड नैराश्यात आहेत. 

राज्य सरकारच्या या सक्तीच्या विज बिल वसुलीच्या धोरणाच्या निषेधार्थ तसेच मृत पावलेल्या शेतकल्या श्रद्धांजली वाहण्यासाठी व सरकारला सुबुद्धी मिळण्यासाठी दि.२६ रोजी विज वितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मर समोर बसुन शेतकरी आत्मक्लेष आंदोलन करणार असल्याचे निवेदन शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदार सोनपेठ यांना देण्यात आले. या वेळी शेतकरी संघटनेचे गणेश पाटील,सुधीर बिंदू ,विश्वंभर गोरवे,माऊली जोगदंड,गणेश पतंगे यांची उपस्थिती होती. 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....