इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-सक्तीच्या विजबिल वसुली विरोधात शेतकरी संघटनेचे अनोखे आंदोलन शुक्रवारी ट्रान्सफॉर्मर समोर करणार आत्मक्लेष

 सक्तीच्या विजबिल वसुली विरोधात शेतकरी संघटनेचे अनोखे आंदोलन 



शुक्रवारी ट्रान्सफॉर्मर समोर करणार आत्मक्लेष

सोनपेठ दि.२२(प्रतिनिधी) काही दिवसांपूर्वी विज तोडल्यानंतर विजेच्या खांबावर चढुन आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या आत्म्याला शांती लाभावी व सरकारला सुबुद्धी लाभावी यासाठी वीज वितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मर समोर बसुन दि.२६ रोजी आत्मक्लेष करणार असल्याचे शेतकरी संघटनेचे गणेश पाटील यांनी सांगितले आहे. 

थकीत विज बिलाच्या वसुलीसाठी राज्य शासनाने विज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर टाकलेल्या दबावामुळे कंपनीचे कर्मचारी शेतकऱ्यांची वीज तोडत आहेत. शेतीमध्ये पिके उभी असुन वीज तोडणीच्या सुलतानी संकटामुळे शेतकरी प्रचंड दबावाखाली आले आहेत. या दबावामुळे शेतकरी आत्मघाता सारखा गंभीर मार्ग अवलंबत आहे. 

पंजाब व हरियाणा च्या शेतकऱ्यांना पाठींबा देणारे राज्य सरकार राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीत वीज बिल बसुलीचा खंजीर खुपसत आहे. 

या वसुलीसाठी वीज तोडल्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने वीजेच्या खांबावर चढुन आपला जीव दिला. राज्यातील शेतकरी हे सक्तीच्या वसुलीमुळे प्रचंड नैराश्यात आहेत. 

राज्य सरकारच्या या सक्तीच्या विज बिल वसुलीच्या धोरणाच्या निषेधार्थ तसेच मृत पावलेल्या शेतकल्या श्रद्धांजली वाहण्यासाठी व सरकारला सुबुद्धी मिळण्यासाठी दि.२६ रोजी विज वितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मर समोर बसुन शेतकरी आत्मक्लेष आंदोलन करणार असल्याचे निवेदन शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदार सोनपेठ यांना देण्यात आले. या वेळी शेतकरी संघटनेचे गणेश पाटील,सुधीर बिंदू ,विश्वंभर गोरवे,माऊली जोगदंड,गणेश पतंगे यांची उपस्थिती होती. 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या