युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडणी थांबवा अन्यथा शेतकर्‍यांना सोबत घेऊन आंदोलन–प्रा.टी. पी.मुंडे

शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडणी थांबवा अन्यथा शेतकर्‍यांना सोबत घेऊन आंदोलन–प्रा.टी. पी.मुंडे



परळी /प्रतिनिधी


महावितरण कंपनीकडून सध्या शहरी आणि ग्रामीण भागात वीज तोडणी मोहीम राबविण्यात येत आहे वाण प्रकल्पावरील तसेच शेतातील कृषिपंपांची वीज तोडणी थांबवा अन्यथा शेतकर्‍यांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा  प्रा. टी. पी.मुंडे (सर) यांनी दिला आहे.


   मांडेखेल येथे वाण प्रकल्प व परिसरातील सर्व शेतकरी यांची बैठक  प्रा.टी. पी.मुंडे (सर)यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.यावेळी मार्केट कमिटीचे उपसभापती प्रा.विजय मुंडे आणि नागापूर सर्कलचे जि. प.सदस्य प्रदीप मुंडे उपस्थित होते. या बैठकीत त्यांनी शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेतली आणि यातून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. राज्य सरकारने शेतकऱ्यांचे कनेक्शन तोडणार नसल्याचे विधिमंडळात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सांगितले होते तसेच राज्याचे ऊर्जामंत्री यांनीसुद्धा शेतकऱ्यांचे कनेक्शन तोडणार नसल्याचे सांगितले होते आणि 100 युनिट पर्यंत विज बिल माफ करू असा निर्णय सरकारने घेतला परंतु यापैकी एकही निर्णय सरकारने पाळला नाही. शेतकरी' शेतमजूर ,दलित, अल्पसंख्यांक यांच्यासाठी गेली चाळीस वर्ष आपण संघर्ष करीत आहोत. शेतकऱ्यांवर जर अन्याय झाला तर तो आपण सहन करणार नाही असे लोकनेते प्रा. टी. पी. मुंडे सर यांनी सांगितले.


   ज्या शेतकऱ्यांची थकबाकी आहे त्या शेतकऱ्यांची महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून ग्रामीण भागात वीज तोडणी चालू आहे त्यामुळे पिकांना जोपासायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. कोरोना महामारी,दुष्काळ, अवकाळी पाऊस यामुळे अगोदरच शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे त्यात शेतकऱ्यांजवळ थकबाकी भरण्यास पैसे नाहीत दरम्यान वाण प्रकल्पात पाणीसाठा मुबलक असतानाच शेतकऱ्यांनी उसाची लागवड केली असतानाच महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वीज कनेक्शन तोडली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे उभे पिक नष्ट होत आहे. यातून महावितरणच्या अधिकारी यांनी तोडगा काढुन शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा शेतकर्‍यांना सोबत घेऊन आंदोलन करण्याचा इशारा प्रा. टी.पी. मुंडे सर यांनी दिला आहे.या बैठकीला परिसरातील कृषी पंप धारक शेतकरी ,सरपंच, परिसरातील नेते ,सेवा सोसायटीचे चेअरमन आदीसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या